Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतकरी सुखावला : राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये तुरीला 9,500 पर्यंतचा भाव
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
शिवारमहाराष्ट्र

शेतकरी सुखावला : राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये तुरीला 9,500 पर्यंतचा भाव

Surajya Digital
Last updated: 2020/10/07 at 8:56 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

वाशिम : तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुरीला शासकीय हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. हमीभाव 5800 असला तरी राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये तुरीला 9500 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. वाशिमच्या बाजार समितीमध्ये शेतकरी आपल्याकडे असलेल्या तुरीच्या विक्रीसाठी गर्दी करताना दिसत आहे. वाशिमच्या बाजार समितीमध्ये तुरीच्या बाजारभावाने 6 वर्षांत पहिल्यांदाच उच्चांक गाठला आहे.

गेल्या काही दिवसापासून तुरीचे भाव वाढताना दिसत आहे. आज पुन्हा तुरीच्या भावामध्ये 100 रुपयांची वाढ झाली असून आता 9500 रुपये प्रती क्विंटल दराने विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आता जादा दर मिळत असल्याचा आनंद दिसत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

2014 मध्ये 13 हजार रुपये प्रती क्विंटल दराने विक्रीनंतर, गेल्या ६ वर्षात तूर विक्रीसाठी मोठ्या अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. आता बाजार समितीमध्ये तुरीला शासकीय हमीभावापेक्षा अडीच ते साडे तीन हजार रुपयांचा अधिकचा दर मिळत आहे.

एकट्या वाशिम जिल्ह्यात 1 लाख 9 हजार 231 क्विंटल तूर शासनाने 5800 रुपये दराने खरेदी केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आजच्या दराच्या तुलनेत 3 हजार रुपये नुकसान होत आहे. मात्र या खरेदीतून सरकारला जवळपास 30 कोटी रुपयांचा फायदा सरकारला झाला. अशाच प्रकारे राज्यातील इतर जिल्ह्यातून सरकारला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. त्यामुळे सरकारने आधारभूत किमतीने विक्री केलेल्या नफ्यामधून शेतकऱ्यांना बोनस देण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार थांबले होते. अनलॉक प्रक्रियेत हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले. यानंतर मागणी वाढल्याने तुरीचे दर वाढले असल्याचं कळतं. तर या वर्षी खरीप हंगामात पिकाचं मोठं नुकसान झालं. परिणामी पिकाच्या उत्पादनात घट होणार असल्याने दरवाढ होत असल्याचं जाणकार सांगतात. मात्र, या दरवाढीमुळं ग्राहकांना तूरडाळ खरेदी करण्यासाठी खिसा थोडा आणखी ढिला करावा लागणार आहे.

You Might Also Like

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल

पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद

TAGGED: #तूर #वाशिम #उच्चांक #बाजारसमित्या #9500भाव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मराठा आरक्षणावरुन संभाजीराजेंचा राज्यसरकारला गंभीर इशारा; उदयनराजेंनी फिरवली बैठकीकडे पाठ
Next Article डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांना फटका

Latest News

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी
देश - विदेश June 25, 2025
केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत
महाराष्ट्र June 25, 2025
विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार
देश - विदेश June 25, 2025
अंतराळातील ऐतिहासिक उड्डाणानंतर शुभांशू शुक्लांची आई भावुक
देश - विदेश June 25, 2025
कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण
महाराष्ट्र June 25, 2025
आणीबाणीच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल
देश - विदेश June 25, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमधून 282 भारतीय मायदेशी परतले
देश - विदेश June 25, 2025
जम्मू-काश्मिरात घुसखोरीचा प्रयत्न उधळला, दहशतवादी ठार
देश - विदेश June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?