वेळापूर : सोलापूर जिल्ह्यातील एफ.आर.पी. ची रक्कम अदा करणारा पांडुरंग कारखाना पहिला कारखाना -ठरला आहे. कारखान्याने गाळप हंगाम २०१९-२० मध्ये गाळप केलेल्या उसाची संपूर्ण एफ.आर.पी. ची रक्कम बँकेत वर्ग केली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऊस बिलाची १४.४२ कोटी जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी दिली.
कारखान्याचा ८ अॉक्टोबर रोजी बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ कारखान्याच्या इतिहासात सुधाकरपंत परिचारक यांच्या अनुपस्थित भावनिक वातावरणात झाला. त्यावेळी मोठे मालकांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करणारे कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांतराव परिचारक यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उर्वरीत एफ.आर.पी. ची देय असणारी रक्कम २०६ रुपये/- प्रती मे. टन प्रमाणे दोन दिवसात देणार असल्याचे जाहीर केले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानुसार कारखान्याने गळीत हंगाम २०१९-२० मध्ये ७,००,१०० मे. टन ऊसाचे प्रती मे. टन रु . २०६ रुपये/- प्रमाणे र.रु.१४.४२ कोटी रक्कम बँकेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. त्यामुळे गळीत हंगाम २०१९-२० मध्ये कारखान्यास पुरवठा केलेल्या ऊसास शासनाने जाहीर केलेल्या संपूर्ण एफ. आर .पी. ची प्रती मे. टन र.रु.२,५०६/- प्रमाणे रक्कम अदा केली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण एफ.आर.पी. ची रक्कम अदा करणारा श्री पांडुरंग हा कारखाना पहिला ठरला आहे.
गळीत हंगाम २०२०-२१ सुरु करण्याच्या दृष्टीने कारखान्यामधील कामे पूर्ण झालेली असून गाळप हंगाम १५ अॉक्टोबरपासून सुरु केला जाणार आहे. या हंगामात कारखान्याकडे सुमारे १२ लाख मे.टन उसाच्या नोंदी असून त्यांचे गाळप कारखाना वेळेवर करणार आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली.