Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यपालांनी स्वाभिमान असेल तर त्यांनी पदावर राहायचं की नाही हे ठरवावे : शरद पवार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

राज्यपालांनी स्वाभिमान असेल तर त्यांनी पदावर राहायचं की नाही हे ठरवावे : शरद पवार

Surajya Digital
Last updated: 2020/10/19 at 4:36 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

उस्मानाबाद : उस्मानाबादमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावर गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर देखील भाष्य केलं आहे. राज्यपाल पद हे देशातील महत्वाच्या पदांपैकी एक आहे. त्या पदाचा मान राखला गेला पाहिजे. तर, राज्यपाल पदासोबतच मुख्यमंत्रीपदाला देखील प्रतिष्ठा असल्याने ती देखील राखली गेली पाहिजे, असं पवार म्हणाले.

राज्यपालांच्या पत्राबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनीच अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याने आता विरोधकांच्या आरोपाला बळ मिळाले आहे. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीचा सेक्युलर असण्याला इतका विरोध पाहाता, राज्यपाल कोश्यारी यांच्यावर मोठी टीका झाली होती.

‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…

‘देशाच्या गृहमंत्र्यांनी त्यांची जी काही कानउघडणी करायची ती काल केली. त्यांना स्वाभिमान असेल तर त्यांनी या पदावर राहायचं कि नाही हे ठरवावं. जाहीरपणाने केंद्राच्या गृहमंत्र्याने अशी टीका-टिपण्णी करून सुद्धा मी त्या जागेवर बसणार असेल तर ठीक आहे’ असा खोचक टोला देखील त्यांनी राज्यपालांना लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊन त्यांना धीर देण्यासाठी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकारचे प्रतिनिधित्व म्हणून ते दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भरीव मदत देऊन शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढतील अशी अपेक्षा केली जात आहे.

You Might Also Like

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

TAGGED: #शरदपवार #राज्यपाल #स्वाभिमान #पदावर #राहयच #ठरवावे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केंद्र सरकार पक्षाचे सरकार नाही, राज्याची काळजी घेणे त्यांचेही कर्तव्य; ठाकरेंचा फडणवीसांनीही टोला
Next Article मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थिल्लर; कर्ज काढा, पण मदत करा

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?