Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतक-यांच्या असाह्यतेवर राजकारण करू नका, पंतप्रधान दारुड्यासारखे देश विकायला निघालेत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

शेतक-यांच्या असाह्यतेवर राजकारण करू नका, पंतप्रधान दारुड्यासारखे देश विकायला निघालेत

Surajya Digital
Last updated: 2020/10/20 at 7:30 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : राज्यात परतीच्या पावसाने घातलेल्या धूमशानामुळे शेतीसह इतर मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं आहे. यानंतर अनेक नेते नुकसानग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील सोलापूरचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला.

यानंतर, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार प्रहार करताना त्यांची जीभ घसरली.

‘केंद्र सरकार हे राज्य सरकारहुन वाईट आहे. हिंदीमध्ये कवाडी म्हणतात तसे पंतप्रधान आहेत. दारुड्या जसं पैसे मिळाले नाही कि पत्नीला मारतो आणि मग त्याच्या लक्षात आलं कि बायकोकडे काही शिल्लक राहिलेलं नाही. मग तो घरातलं सगळं सामान विकतो. अन तेही संपलं की तो मग घरच विकतो. मोदी या देशातला पंतप्रधान नसून हा दारुडा आहे आणि म्हणून इथलं अख्ख विकायला निघाला आहे’ असा एकेरी उल्लेख करत त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि भाजपने राजकारण थांबवावं. टोलवाटोलवी बंद करावी. आधीच लोक कोरोनाने त्रासलेले आहेत. उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यामुळे शेतक-यांना दिलासा द्या. मदत द्या. शेतक-यांच्या असाह्यतेवर राजकारण करू नका, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदे दरम्यान दिला.

मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागात जाणे म्हणजे एक प्रकारचा दिलासा असतो. मुख्यमंत्र्यांनी एकाच जिल्ह्यात जाऊ नये, अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे, लवकरात लवकर सरकारने मदत केली पाहिजे. मात्र, तीन पायांच्या या सरकारमधील एक पाय मदत जाहीर करू नये म्हणून दुसऱ्यावर दबाव टाकत असल्याचा मला वास येत असल्याची टीका देखील आंबेडकरांनी यावेळी केली.

You Might Also Like

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री

आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांनी घ्यावी – एकनाथ शिंदे

हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही – एकनाथ शिंदे

TAGGED: #प्रकाशआंबेडकर #शेतक-यांच्या #असह्यतेचे #राजकारण #नरेंद्रमोदी #दारुडा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली; शुभेच्छा देण्यासाठी एनसीपीत झुंबड, कोण दिली माहिती ?
Next Article राज्यपालांच्या अडचणीत वाढ; हायकोर्टाने बजावली नोटीस, खटला दाखल का करु नये

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?