Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतक-यांना मदत कधी ? मदतीसाठी आणखी किती वाट पाहायची ? आजची बैठक रद्द
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

शेतक-यांना मदत कधी ? मदतीसाठी आणखी किती वाट पाहायची ? आजची बैठक रद्द

Surajya Digital
Last updated: 2020/10/23 at 11:02 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. पण गुरुवार पाठोपाठ आज शुक्रवारी होणारी मंत्रिमंडळ बैठकही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अतिवृष्टीने पिचलेल्या शेतक-यांना कधी मदत मिळणार, आणखी किती वाट पाहायची, असा सवाल करण्याची वेळ आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्यामुळं ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी अजून किती वाट पाहावी लागणार? असा प्रश्न विरोधकांसह शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. अशा स्थितीत अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता मदतीसाठी आठवडाभर वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना ताप आल्यानं ते होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यांची कोरोना चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीला अजित पवार उपस्थित राहू शकत नसल्यामुळं ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, अजित पवार हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहू शकतात अशी चर्चा काल सुरु होती. पण आता ही बैठकच आठवडाभरासाठी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळं मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता मदतीसाठी अजून आठ दिवस वाट पाहावी लागणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोलापूर पाहणी दौऱ्यावेळी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा करुन शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असं आश्वासन महसूलमंत्री थोरात यांनी दिलं होतं. पण गुरुवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली. त्यानंतर ही बैठक शुक्रवारी म्हणजे आज होणार असं सांगण्यात आलं. पण आज होणारी मंत्रिमंडळ बैठकही आता आठवड्याभरासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळतेय.

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #बैठकरद्द #शेतक-यांना #मदतकधी #कितीवाट #पाहयची #विरोधक #शेतक-यांचा #सवाल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोकणवासियांसाठी महत्त्वाची बातमी; वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या वेगाने हालचाली
Next Article भाजपाकडे कार्यकर्त्यांची फळी; मात्र नाथाभाऊंकडून समाजोपयोगी कामे करुन घ्या

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?