नवी दिल्ली / मुंबई : कृषी कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांच्या विरोधात आज सुमारे 50 हून अधिक संघटनांनी भारत बंद पुकारला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रोखून धरली आहे. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे निर्देश दिले.
पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, झारखंड आणि दिल्लीसह 11 राज्य सरकारांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला चोहोबाजूंनी घेरले आहे. सीमेहून 20 किमी मुरथलपर्यंत ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या रांगा लागल्या असून हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने येत आहेत. कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी हा भारत बंद पुकारला आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चक्का जाम केला जाईल. काँग्रेससह 20 राजकीय पक्षांनी बंदला पाठिंबा दिला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बुलडाणा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रेल रोको आंदोलन केले. भुवनेश्वर येथे डावी आघाडी आणि कामगार संघटनांनी नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरु केले असून. आंदोलकांनी ‘रेल रोको’ आंदोलन केले. आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडा येथे शेतकरी संघटना आणि डाव्या पक्षांनी धरणे आंदोलन केले.
पुणे जिल्ह्यातल भारत बंदला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक बाजार समित्या बंद आहेत. मार्केटमध्ये अगदीच तूरळक प्रमाणात लोक दिसत आहेत.