Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस – गारपीट, अवकाळीने शेतकरी चिंतेत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

राज्यात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस – गारपीट, अवकाळीने शेतकरी चिंतेत

Surajya Digital
Last updated: 2020/12/12 at 9:23 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : मुंबई, ठाण्यासह उपनगरात ढगाळ वातावरण असून उर्वरित राज्यातील भागांमध्ये रिमझिम पाऊस असणार आहे. पुढचे तीन दिवस राज्यात उत्तर महाराष्ट्र वगळता सर्वत्र ढगाळ वातावरण आणि रिमझिक अथवा तुरळक पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडले यावेळी गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही असा अंदाज हवामना विभागाकडून देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात पुढचे 48 तास रिमझिम पाऊस असेल तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाचा तुरळक सरी पडतील. धुळे आणि नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगावात पुढचे दोन दिवस शेतकऱ्यांना प्रशासनाकडून अलर्ट देण्यात आला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* अवकाळीने शेतकरी चिंतेत

डिसेंबर महिन्यात आलेल्या या पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. झाडांना आलेला मोहोर गळून पडू शकतो. त्यामुळे शेतकरी देखील चिंतेत आहे. आधीच यंदाच्या वर्षात कोरोना त्यानंतर लॉकडाऊन आणि महापूर या सगळ्यातून बळीराजा पुन्हा उभा राहिला असताना आता अवकाळी पावसाचं संकट डोकं वर काढत आहे.

* नंदुरबार जिल्ह्यात जोर वाढला

पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली होती. नंदुरबार जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं पुन्हा जोर धरला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये डिसेंबर महिन्यात पाऊस पडत आहे. पावसामुळे थोडा गारवा पसरत असला तरी पाऊस पडून गेल्यावर खूप जास्त उकाडा वाढत आहे. राज्यात सर्वजण थंडीची आतूरतेनं वाट पाहात असताना अचानक आलेल्या या पावसानं सगळ्यांची तारांबळ उडाली आहे.

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #राज्यात #वादळीवा-यासह #मुसळधार #पाऊसगारपीट #अवकाळीने #शेतकरी #चिंतेत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोल्हापुरात क्रिकेट स्पर्धेच्या नावाखाली नाचविल्या ‘चिअरगर्ल्स’, व्हिडिओचा सोशलमीडियावर धुमाकूळ
Next Article सीबीआयच्या ताब्यातील 45 कोटींचं 103 किलो सोनं गायब

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?