Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काँग्रेस, डावे पक्ष शेतकऱ्यांच्या वेशभूषेत शेतकरी आंदोलनात लपून बसल्याचा आरोप
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारण

काँग्रेस, डावे पक्ष शेतकऱ्यांच्या वेशभूषेत शेतकरी आंदोलनात लपून बसल्याचा आरोप

Surajya Digital
Last updated: 2020/12/13 at 11:20 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सिहोर : भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि डावे पक्ष शेतकऱ्यांच्या वेशभूषेत लपून कृषी कायद्यांविरोधात आंदोलनाला बसले आहेत. या देशविरोधी शक्ती शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असं म्हणत शेतकरी आंदोलनवरून प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शाहीनबाग आंदोलनाचा उल्लेख केला.

भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. शाहीनबागमध्ये ज्या प्रकारे जेएनयूतील काही लोक, चित्रपट क्षेत्रातील काही डाव्या विचारांचे कलाकार सहभागी होते. तेच चेहरे आता पुढे येत आहेत. असे लोक देशाचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना तुरुंगात टाकलेलंच योग्य होईल.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पंजाबमधील काँग्रेस सरकारने हे नवीन कृषी कायदे लागू केलेला नाही. तरीही पंजाबमधील लोक इथं येऊन आंदोलन का करत आहेत? असा सवाल प्रज्ञासिंह यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यात कुठल्याही सुधारणांची गरज नाही. सर्व सुधारणा करून हे कायदे आणले गेले आहेत, असं म्हणत प्रज्ञासिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा तीळपापड झाल्या आहे. हा भारत आहे, पाकिस्तान नाही, त्यांना समजलंय. हे बंगालमध्ये भाजप आणि हिंदूंचे राज्य येईल. बंगाल हा अखंड भारताचा एक भाग आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. बंगाल आपले हिंदू राज्य होईल. भारत एक हिंदू राष्ट्र होईल, असं प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या.

देशविरोधी कारवाया करणाऱ्यांविरोधात लोकसंख्या नियंत्रण कायदा असायला हवा. पण जे राष्ट्रधर्मासाठी कार्य करतात त्यांच्यावर या बंधन आणू नये, प्रज्ञासिंह म्हणाल्या. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नाव न घेता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांना लक्ष्य केलं. जे देशाचा अपमान करतात आणि भगवाधारींना दहशतवादी ठरवतात ते क्षत्रिय नाहीत. हे लोक भगवा आणि हिंदुत्वाचा अपमान करतात, अशांना राजे म्हणू नये, असा टोला प्रज्ञासिंह यांनी लगावला.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

TAGGED: #काँग्रेस #डावेपक्ष # शेतकऱ्यांच्या #वेशभूषेत #शेतकरीआंदोलनात #लपून #बसल्याचा #आरोप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article १२ वीच्या परीक्षेसाठीचे अर्ज १५ डिसेंबर ते ४ जानेवारीत भरता येणार
Next Article घरात संवाद असावा, ही माझी पहिल्यापासून भूमिका; पुन्हा एकदा साद

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?