अमरावती, 13 जून (हिं.स.)
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यासह 17 मागण्यासाठी बच्चू कडू हे गुरुकुंज मोझरी येथे गेल्या सहा दिवसापासुन अन्नत्याग आंदोलन करीत आहे, अद्याप मागणी पूर्ण न नसल्याने प्रहार व शेतकऱ्यांच्या विविध संघटना व विरोधी पक्षाचे वतीने शनिवारी रास्तारोको चक्का जाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता,मात्र अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेत बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबाप्रती शोक संवेदना म्हणून पाठिंबा देणाऱ्या सर्व नेते,सामाजिक संघटना,आणि आंदोलकांच्या निर्देशानुसार 14 जूनचे राज्यव्यापी चक्का जाम आंदोलकांच्या एकत्रित निर्णयानुसार एक दिवस पुढे ढकलून 15 जून रोजी करण्यात येईल अशी माहिती प्रहार संघटनेचे पदाधिकारी यांनी दिली.