Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दरड कोसळून मोठी दुर्घटना, 14 जणांचा मृत्यू, आणखी 6 ते 8 जण अडकल्याची भीती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

दरड कोसळून मोठी दुर्घटना, 14 जणांचा मृत्यू, आणखी 6 ते 8 जण अडकल्याची भीती

Surajya Digital
Last updated: 2021/07/18 at 1:57 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : मुंबईच्या चेंबुर येथील भारत नगर येथे दरड कोसळून मोठी जीवीतहानी झाली आहे. यात 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरड कोसळून 4 ते 5 घरांचे नुकसान होऊन नागरिकांचा मृत्यू झाला. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. माहिती मिळताच एनडीआरएफकडून तातडीने बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत ढिका-याखालून 13 जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली आहे.

Maharashtra | 11 people killed after a wall collapse on some shanties in Chembur's Bharat Nagar area due to a landslide, says National Disaster Response Force (NDRF)

Rescue operation is underway. pic.twitter.com/W24NJFWThU

— ANI (@ANI) July 18, 2021

मुंबईतील वाशीनाका-चेंबूरमध्ये पावसाने रौद्ररुप दाखवले आहे. घरांवर दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यात आणखी 6 ते 8 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी आहे आणि शोधकार्य आणि बचावकार्य सुरू आहे. मुंबईसह चेंबूर आणि अन्य उपनगरांत मुसळधार पावसाने मोठी पडझड झाली आहे.

चेंबूर आणि अन्य ठिकाणी झालेल्या घटनांमध्ये 16 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. चेंबूरसह विक्रोळी येथेही दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर तिसरी घटना भांडुपमध्ये घडली आहे. आणखी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. जखमींना राजावाडी तसंच जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आलं आहे.

अपडेट न्यूज

मुंबईत पावसामुळे झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी मोदी सरकारने 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर झाली आहे. मुंबईत शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. यामुळे मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत  आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

मुंबई : दरड कोसळून मोठी दुर्घटना, 11 जणांचा मृत्यू, आणखी 6 ते 8 जण अडकल्याची भीती #भीती #mumbai #surajyadigital #सुराज्यडिजिटल #मुंबई #11death #दुर्घटना pic.twitter.com/ApTFkaCeDr

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होत आहे. फोर्ट परिसर, कल्याण, भांडूप, अंधेरी, बोरिवली, कांदिवली या परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे.

ठाणे आणि रायगडमध्येही मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील हिंदमाता आणि अन्य सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

Maharashtra: A ground-plus-one residential building collapsed in Mumbai's Vikhroli area in the wee hours of Sunday, killing three people, as per BMC

Rescue operation is underway pic.twitter.com/Kw0WjI7iw4

— ANI (@ANI) July 18, 2021

मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या तुफान पावसामुळे अनेक परिसर जलमय झाला आहे. रात्रभर कोसळल्यानंतर सकाळच्या सुमारास पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानंतर काही भागांमधून पाणी ओसरायला सुरुवात झाली.

या पावसामुळे दहिसर नदीचं पाणी बोरीवली पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणावर साचलं होतं. ते देखील ओसरू लागलं आहे. अजूनही मुंबईच्या काही भागांमध्ये पाणी साचलेलं असून मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा रेल्वेच्या वाहतुकीवर पावसाचा परिणाम झाला आहे.

दरम्यान, चेंबूर परिसरात मध्यारात्रीनंतर दरड कोसळल्याने अकरा जण मृत्यूमुखी पडले आहेत. ही दरड खाली असलेल्या घरांवर कोसळल्याने ही दुर्घटना घडली. दरम्यान याची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकाने तात्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. तर, येथे ढिगार्‍याखाली काही जण अजून अडकून पडले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे.

You Might Also Like

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

TAGGED: #Fear #major #accidents #Landslides #14deaths #trapped, #दरड #कोसळून #मोठीदुर्घटना #14जणांचा #मृत्यू #भीती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी शिवशाही बस सज्ज, सोमवारी पंढरपूरकडे प्रस्थान
Next Article 6 बॉलमध्ये सलग 6 सिक्स, पुन्हा विक्रम, झाली युवराजची आठवण

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?