सोलापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारबद्दल मोठं विधान केलं. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी मतदान होत असून 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे. हे निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग लागेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच हे सरकार पडणार आहे हे इयत्ता आठवीतील मुलगाही सांगू शकेल, असंही ते म्हणाले.
पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर घणाघाती टीका करतानाच सरकार पडण्याचं भाकीतही केलं. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या सरकारकडे काहीच नियोजन नाही, प्लॅनिंग नाही. सरकारमध्ये विलपॉवर कमी आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेतला जात नाही. इयत्ता आठवीतला मुलगाही राजकीय विश्लेषण करू शकेल. हे सरकार लवकरच पडेल. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका योग्य पद्धतीने बजावत आहोत, असेही पाटील म्हणाले.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1382366844678381571?s=19
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केलेलं पॅकेज फसवं आहे. या सरकारने दीड हजार रुपये मदत देऊन गोरगरिबांची चेष्टा केली आहे. दीड हजारात कुटुंबाचा खर्च चालतो का, असा सवाल त्यांनी केला. लॉकडाऊनला आमचा विरोध नाही हे आम्ही आधीपासून सांगतोय. कोरोनाची साखळी तोडलीच पाहिजे. परंतु गडी, हमाल, माथाडी कामगार, व्यापारी हा वर्ग मोठा आहे. त्याचा या पॅकेजमध्ये विचार करण्यात आलेला नाही, असेही ते म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआयकडून होत असलेल्या चौकशीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. सीबीआय चौकशीतून जे दोषी आहेत, ते उघड होईल. दोषी असणाऱ्यांवर एफआयआर नोंदवला जाईल. तसेच त्यांच्यावर अटकेपासून ते सर्व कारवाई करण्यात येईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1382540077167878151?s=19
* आरोग्य सुविधेबाबत प्लॅनिंग नाही
राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा रद्द होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत सरकारने गंभीरपणे विचार केलेला दिसत नाही. ऑक्सिजन नसल्यामुळे डॉक्टर रडले. सरकारने आरोग्य यंत्रणेचे काहीच प्लॅनिंग केले नाही. आम्हा आमदारांच्या विकास निधीतले चार कोटी काढून दोन कोटी रुपये सरकारला द्यायला हवे होते. तेही केले नाही. रेमडेसिविर इंजेक्शनसाठी वणवण भटकावे लागत आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.