पंढरपूर : उजनी जलाशयातील ५ टीएमसी पाणी ‘सांडपाणी’ हा दिशाभूल करणारा शब्द वापरुन बारामतीकरांच्या नेतृत्वाखाली इंदापूरला देण्याचा निर्णय झाला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला. शेतकरी नेते आक्रमक झाले. त्यामुळे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा निर्णय रद्द झाल्याचा व्हिडीओ व्हायरल केला. मात्र याठिकाणी पुन्हा दिशाभूल झालीय. आज ६ दिवस झाले तरी याबाबत कोणताच शासकीय अध्यादेश न निघाल्याने आतापर्यंत शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाचा भडका उडाला असून उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे टायर पेटवून शासनाचा निषेध व्यक्त करत घोषणा देण्यात आल्या.
महाराष्ट्रात सोलापूरसह 14 जिल्ह्यांतील लॉकडाऊन वाढणार https://t.co/es598EEATJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
यावेळी बोलताना अतुल खुपसे पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील २२ गावं १९७१ पासून पाण्यासाठी झगडत आहे, त्यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्या शेतकऱ्यांसाठी निरा डाव्या कालव्यातून आणि खडकवासला धरणातून तरतूद करुन ऊस लावण्याची परवानगी दिली होती मग ५० वर्षानंतरदेखील तिथले शेतकरी पाण्यासाठी झगडत आहेत तर त्यांना तरतूद केलेले पाणी गेले कुठे..? असा सवाल करुन त्यांनी केवळ इंदापूर व सोलापूरकरांची भांडणे लावल्याचे महापाप केले असून याची किंमत त्यांना येणाऱ्या काळात मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे.
उजनी धरणाच्या गेटवर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा पुतळा जाळला (संतोष वाघमारे -टेंभुर्णी )#surajyadigital #ujjain #सुराज्यडिजिटल #जयंतपाटील #jayantpatil #पुतळा #status https://t.co/TA5BOjq4HY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दिपक वाडदेकर म्हणाले की, शेतकऱ्यांना कोणती जात नसते, कोणता पक्ष नसतो, त्यामुळे आम्ही इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विरोधात नाही. गेल्या ५० वर्षापासून ते शेतकरी संघर्ष करत आहेत. त्यामुळे त्यांना पाणी मिळायला हवे असे आम्हाला देखील वाटते मात्र त्यासाठी सोलापूरच्या शेतकऱ्यांवर अन्याय कशासाठी..? त्यासाठी पुणे जिल्ह्यातील धरणांमधून तरतूद करावी. बारामतीकर गेल्या ५० वर्षात या शेतकऱ्यांच्या जिवावर राज्य करत आहेत मग इंदापूरचे शेतकरी त्यांना आपलेसे वाटत नाहीत का..? असा घणाघात करत भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडू प्रसंगी रक्त सांडु मात्र उजनी जलाशयातील एक थेंब पाणी जावु देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
दोंडाईचामध्ये शेतात आढळले ११ इंची धातूचे जैन मंदिर https://t.co/Njdbn298Hh
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
दरम्यान शेकडो शेतकऱ्यांना घेवुन ‘पाणी आमच्या हक्काचे…. नाही कुणाच्या बापाचे, या बारामतीकरांचे कराचे काय..? खाली मुंडके वर पाय’ अशा घोषणा देवुन टायरे पेटवुन निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनानंतर शेतकरी नेते व शेतकऱ्यांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यावेळी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील, सचिव माऊली हळणवर, दिपक वाडदेकर, निवास नागणे ,विक्रांत जगदाळे, वैभव नागणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
“इंदापूर तालुक्याचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी मोठ्या कष्टाने तालुक्यातील २२ गावांसाठी पाणी खेचुन आणले होते मात्र याचे श्रेय त्यांना जाईल या भीतीपोटी बारामतीकरांनी इंदापूरकरांना पाणी मिळु दिले नाही. आज हर्षवर्धन पाटील त्यांच्यासोबत नाहीत. त्यामुळे पायाखालची जमीन सरकलेल्या बारामतीकरांनी उजणीवर डोळा ठेवला व बारामती मतदारसंघ वाचावा म्हणून दिशाभूल करत उजनीचे पाणी पळविण्याचा घाट बांधला तो आम्ही कधीच यशस्वी होवु देणार नाही.”
– माऊली हळणवर
सचिव, उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती