Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अहमदाबाद : विमान अपघातातील २१५ मृतदेहांची ओळख पटली, १९८ मृतदेह नातेवाइकांना सुपूर्द
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

अहमदाबाद : विमान अपघातातील २१५ मृतदेहांची ओळख पटली, १९८ मृतदेह नातेवाइकांना सुपूर्द

admin
Last updated: 2025/06/20 at 4:50 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अहमदाबाद, 20 जून (हिं.स.)।अहमदाबादमध्ये घडलेल्या एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २७० पैकी, आतापर्यंत २१५ मृतदेहांची ओळख डीएनए चाचणीद्वारे पटवण्यात आली असून त्यातील १९८ मृतदेह नातेवाइकांच्या हवाली करण्यात आले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.

लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया फ्लाईट एआय-१७१मध्ये २४२ प्रवासी व कर्मचारी होते. हे विमान उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच अहमदाबादच्या मेघाणीनगर भागातील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले आणि भीषण आगीत भस्मसात झाले. विमानातील एक व्यक्ती वगळता बाकी सर्व लोकांचा मृत्यू झाला. तसेच वसतिगृह परिसरातील २९ लोकही मरण पावले. दरम्यान, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी २१५ मृतदेहांची ओळख डीएनए चाचणीद्वारे पटवण्यात आली असून त्यातील १९८ मृतदेह नातेवाइकांच्या हवाली करण्यात आले आहे.

या अपघातग्रस्त विमानाबाबत एअर इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी गुरुवारी(दि.१९) सांगितले की, अपघातग्रस्त बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर या विमानाची व्यवस्थित देखभाल करण्यात येत होती. जून २०२३मध्ये त्याची बारकाईने तपासणी करण्यात आली होती. तसेच पुढील तपासणी डिसेंबर २०२५मध्ये होणार होती. विमानाचे उजवे इंजिन यंदाच्या वर्षी मार्चमध्ये, तर डावे इंजिन एप्रिलमध्ये तपासण्यात आले होते. तसेच उड्डाणापूर्वी या विमानात कोणताही दोष आढळून आला नव्हता.

एअर इंडिया विमानाला झालेल्या अपघाताला एक आठवडा उलटला असला तरी विमानाच्या शेपटासह अन्य अवशेषांचा ढिगारा अद्याप अपघातस्थळी तसाच पडून आहे. या दुर्घटनेच्या तपासाचे काम गुजरात सरकारकडे नसून त्यांचे अग्निशमन कर्मचारी, न्यायवैद्यकीय तज्ज्ञ केंद्राच्या यंत्रणांना मदत करणार आहेत.

You Might Also Like

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एका नवीन क्रांतीची सुरुवात बारामतीतून – शरद पवार
Next Article खामेनी यांचे अस्तित्व संपवून टाकण्याचा इस्रायलचा लष्कराला आदेश

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?