अहमदाबाद, 12 जून (हिं.स.)।येथील विमान अपघाताच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. हा अपघात गुरुवारी (दि.१२) दुपारी झाला आहे. या घटनेवर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून आपल्या संवेदना व्यक्त करत दु:ख व्यक्त केले आहे.
अभिनेता सनी देओल एक्सवरील पोस्टमध्ये म्हंटल आहे की, अहमदाबादमधील विमान अपघाताच्या बातमीने मी खूप दुःखी आहे. वाचलेल्यांसाठी मी मनापासून प्रार्थना करतो – त्यांना सापडावे आणि त्यांना आवश्यक असलेली काळजी मिळावी. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या अकल्पनीय काळात शक्ती मिळो.
तर अभिनेता रितेश देशमुखने आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हंटलं आहे की, अहमदाबादमधील दुर्दैवी विमान अपघाताबद्दल ऐकून मी पूर्णपणे दु:खी आणि धक्कादायक आहे. सर्व प्रवाशांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि जमिनीवर असलेल्या प्रत्येकाला … या अविश्वसनीय कठीण काळात मी त्या सर्वांसाठी प्रार्थना करतो.
सोनू सूद यांनीही या दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले, “लंडनसाठी उड्डाण भरल्यानंतर अहमदाबादमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या विमानासाठी प्रार्थना.” यासोबतच त्यांनी हृदय तुटल्याचा इमोजी देखील शेअर केला आहे. तर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांनी लिहिले – “एअर इंडिया दुर्घटनेने हादरलो आहे आणि सुन्न झालो आहे. सध्या फक्त प्रार्थनाच आहेत.”
अभिनेता नील नितीन मुकेश यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले आहे, “या दुःखद बातमीने मन सुन्न झालं आहे, मी हादरलो आहे. एअर इंडिया विमान दुर्घटनेत प्रभावित झालेल्या कुटुंबीयांप्रती आणि त्यांच्या प्रियजनांप्रती माझी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. ईश्वर दिवंगत आत्म्यांना शांती देवो आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.”
अभिनेत्री परिणीती चोप्रा यांनीही या विमान अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे, “एअर इंडिया विमान अपघातानंतर कुटुंबीयांच्या दुःखाची कल्पना करणे देखील खूप कठीण आहे. ईश्वराकडे प्रार्थना करते की सर्वांना ताकद आणि धैर्य मिळो.”
दरम्यान, २४२ प्रवाशांना घेऊन अहमदाबादवरुन लंडनला निघालेले
एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील रुपानी नगर येथे कोसळल्याची घटना गुरुवारी(दि.१२) दुपारी घडली. टेक ऑफनंतर काही मिनिटांमध्येच विमान कोसळले असून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.माहितीनुसार, या दुर्घटनाग्रस्त विमानात भारतीयांसोबत परदेशी नागरिकही प्रवास करत होते.