Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विमान कंपन्यांनी सुरक्षितता मानकांचे पालन करावे – उपमुख्यमंत्री
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

विमान कंपन्यांनी सुरक्षितता मानकांचे पालन करावे – उपमुख्यमंत्री

admin
Last updated: 2025/06/12 at 6:48 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 12 जून (हिं.स.)। गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरुन लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान अहमदाबाद शहरातील इमारतींवर कोसळून झालेल्या अपघातात प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांचा झालेला मृत्यू धक्कादायक, क्लेशदायक, दुर्दैवी घटना असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. अहमदाबाद शहरातील या विमान अपघातामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश आज दु:खी असून मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात प्रत्येक महाराष्ट्रवासी सहभागी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनींही विमान दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून अपघाताची संपूर्ण माहिती घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गुजरातला पाठवले. या दुर्घटनेच्या निमित्ताने विमानसेवेच्या सुरक्षिततेकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. विमानसेवा कंपन्यांनी त्यांच्या विमानसेवेच्या सुरक्षेचा फेरआढावा घेऊन, सुरक्षितता मानकांचे पालन करुन भविष्यात अशी दुर्घटना होणार नाही, हे सुनिश्चित करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान, अकोला, बुलडाणा दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले कार्यक्रम साध्या पद्धतीने घेत दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

अहमदाबादहून लंडनला जाणारे एअरइंडियाचे विमान उड्डाणानंतर थोड्याच वेळेत अहमदाबाद शहरातील इमारतींवर कोसळले. ती संपूर्ण दुर्घटना धक्कादायक, क्लेशदायक होती. गुजरात पोलिस, अग्निशमन, अ‍ॅम्ब्युलन्स सेवा, वैद्यकीय पथकांनी, सुरक्षादलांनी दुर्घटनास्थळी पोहोचून तातडीने बचाव व मदतकार्य तातडीने राबवले. परंतु झालेली जिवितहानी खुप मोठी असून ती भरुन निघणार नाही. अपघाताचे निश्चित कारण अद्याप कळले नसले तरी चौकशीअंती ते स्पष्ट होईल. परंतु अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे असेही अजित पवार म्हणाले.

You Might Also Like

आईला हृदयविकाराचा झटका आल्याने गौतम गंभीर परतला मायदेशी

विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे खेळाडू काळी फित बांधून उतरले मैदानावर

शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंग : यूजीसीची महाराष्ट्रातील ३, देशातील ८९ विद्यापीठांना नोटीस

इस्रायल-इराण युद्धावर भारताने व्यक्त केली चिंता

पठाणकोटमध्ये वायूदलाच्या अपाचे हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अहमदाबादमधील ही दुर्घटना सुन्न आणि व्यथित करणारी – नरेंद्र मोदी
Next Article अहमदाबाद : विमान दुर्घटनेवर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केले दुःख

Latest News

आईला हृदयविकाराचा झटका आल्याने गौतम गंभीर परतला मायदेशी
देश - विदेश June 13, 2025
मुंबईत वीज वितरण परवान्याची महावितरणची मागणी
महाराष्ट्र June 13, 2025
विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे खेळाडू काळी फित बांधून उतरले मैदानावर
देश - विदेश June 13, 2025
शनिशिंगणापूर देवस्थानातून 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांची गच्छंती
महाराष्ट्र June 13, 2025
शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंग : यूजीसीची महाराष्ट्रातील ३, देशातील ८९ विद्यापीठांना नोटीस
देश - विदेश June 13, 2025
इस्रायल-इराण युद्धावर भारताने व्यक्त केली चिंता
देश - विदेश June 13, 2025
बच्चूभाऊंच्या उपोषणाची दखल न घेतल्याने प्रहारच्या पदाधिकाऱ्याने केलं विष प्राशन
महाराष्ट्र June 13, 2025
सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या पेरण्यांना सुरुवात
सोलापूर June 13, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?