Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कारंबा उपसा सिंचन प्रकल्प 21 वर्षानी झाला साकार; अक्कलकोटसह आसपासच्या शेतक-यांना दिलासा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
शिवारसोलापूर

कारंबा उपसा सिंचन प्रकल्प 21 वर्षानी झाला साकार; अक्कलकोटसह आसपासच्या शेतक-यांना दिलासा

Surajya Digital
Last updated: 2020/09/09 at 2:05 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूरला उजनीच्या डाव्या कालव्यातून पाणी आणण्याची योजना अर्थात कारंबा उपसा सिंचन प्रकल्प अखेर वीस वर्षांने का होईना पूर्ण झाला आहे. गेली 21 वर्ष हा प्रकल्प रखडलेला होता. राजकीय इच्छाशक्ती आणि निधी दोन्हींच्या अभावामुळे हा बंद होता. सोलापूर शहर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर इत्यादी भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या प्रकल्पाची क्षमता 240 क्यूसेक इतकी असून 50 हजार हेक्टर क्षेत्र या प्रकल्पामुळे ओलिताखाली येणार आहे. तब्बल 20 वर्षांनी शेतकरी आणि जनसामान्यांची तहान भागणार आहे, सध्या दोन पंपावर प्रयोग यशस्वी झाला असून काही दिवसांत पूर्ण क्षमतेने म्हणजे 265 अश्वशक्तीच्या 6 पंपांनी हे पाणी उपसून हिप्परगा तलावात सोडले जाईल.

उजनी धरणातून हिपरग्गा तलाव्यात पाणी सोडण्यासाठी  1999 साली मंजूरी देण्यात आलेली योजना अखेर 21 वर्षांनी कार्यान्वित झाली आहे. सोलापूरला उजनीच्या डाव्या कालव्यातून पाणी आणण्याची योजना 21 वर्षांपूर्वी आखली गेली होती. गेली 21 वर्ष हा प्रकल्प रखडलेला होता. राजकीय इच्छाशक्ती आणि निधी दोन्हींच्या अभावामुळे हा बंद होता. मात्र अखेर 21 वर्षांनंतर ही योजनेची चाचणी यशस्वीपणे पुर्ण झालीय. येत्या आठ ते दहा दिवसात ही योजना पूर्ण क्षमतेने सुरु होणार असल्याची माहिती सहाय्यक अभियंता चेतन राठोड यांनी दिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी उजनी धरण देखील आहे.धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला तरी सोलापूर शहर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर इत्यादी भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे उजनीचे पाणी हिप्परगा तलावात सोडण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मात्र तांत्रिक अडचणी आणि निधी अभावी गेली अनेक वर्ष ही योजना रखडलेली होती. त्यामुळे आजूबाजूच्या अनेक गावांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटण्यासाठी मदत होणार आहे.

उजनीतून विसर्ग करण्यात आलेले पाणी कारंबा शाखा कालव्यामार्गे हिप्परगा तलावात सोडण्यासाठी भोगाव हद्दीतील हिप्परगा तलावाच्या उजव्या बाजूला पंप हाऊस उभारण्यात आला आहे. पाणी लिफ्ट करण्यासाठी या पंप हाऊसमध्ये 6 मोटर बसवण्यात आल्या आहेत. ज्यांची क्षमता 265 एचपी इतकी आहे. जलसंपदा विभागाने तयार केलेल्या या योजनेतून उजनीचे पाणी हिप्परगा तलावात टाकण्यात येणार आहे. या सहा पंप पैकी दोन पंपची चाचणी यशस्वीपणे पार पडली. येत्या आठ दिवसात उर्वरित चार पंप देखील कार्यान्वित होणार आहेत.

* 17 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ

दरम्यान हिपरगा तलावात आलेले पाणी क्षमतेनुसार एकरुख सिंचन योजनेच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यासाठी देखील देता येणार आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्यातील कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. त्यामुळे येणाऱ्या पुढील काही दिवसात पहिल्या टप्प्यात पाणी बोरामणीपर्यंत पोहोचवता येणं शक्य असल्याची माहिती देखील जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. या योजनेमुळे अवर्षनप्रवन अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 17 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #अक्कलकोट #कारंबा #उपसा #सिंचन #योजना #प्रकल्प #17हजारहेक्टर #क्षेत्र #21वर्ष
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कंगनाने आपल्या कार्यालयाला ‘राम मंदिर’ तर महापालिका कर्मचा-यांना म्हटले ‘बाबरची आर्मी’
Next Article मराठा समाजाला नोकरी, शिक्षणांमध्ये आरक्षण नाही; याचिका 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?