Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मराठा आरक्षण: सर्वपक्षीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय; मुख्यमंत्र्यांच्या बाजुला शरद पवारांची उपस्थिती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

मराठा आरक्षण: सर्वपक्षीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय; मुख्यमंत्र्यांच्या बाजुला शरद पवारांची उपस्थिती

Surajya Digital
Last updated: 2023/11/01 at 7:17 PM
Surajya Digital
Share
7 Min Read
SHARE

 

Contents
○ ‘मराठा आरक्षणासाठी 3 निवृत्त न्यायाधीशांची कमिटी गठीत ‘स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

○ ‘मराठा आरक्षणासाठी 3 निवृत्त न्यायाधीशांची कमिटी गठीत ‘

 

मुंबई : 32 नेत्यांच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, यावर सर्वांचे एकमत झाले आहे. मराठा आरक्षणासाठी तीन निवृत्त न्यायाधीशांची कमिटी गठीत केली आहे. Important decisions in all-party meetings; Sharad Pawar next to the Chief Minister! तसेच मागास वर्ग आयोगाकडूनही काम सुरु आहे. यासाठी लागणारा अवधी सरकारला दावा व मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.

 

मराठा आरक्षणासाठी बोलावण्यात आलेल्या मुंबईतल्या आजच्या बैठकीत शरद पवार यांनी हजेरी लावली. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजुला बसलेले दिसून येत आहेत. त्यांचा फोटो व्हायरल होत आहे. शिंदे यांच्या एका बाजुला देवेंद्र फडणवीस तर दुसऱ्या बाजुला शरद पवार बसले होते. या फोटोवर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. बैठकीत सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी मते मांडली आहेत.

 

मुंबईत आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत महत्त्वाचे ठराव करण्यात आले आहे. ‘मराठा आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे. याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करुनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते व त्यासाठी राज्यातील सर्व राजकीय पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत, कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी, मात्र त्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहे,’ असे या ठरावात स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन बोलवण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीस सह्याद्री अतिथीगृह सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. बैठकीत देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, अशोक चव्हाण, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, जयंत पाटील, नाना पटोलेंची यासह अनेक नेते उपस्थित आहेत.

 

मराठा आरक्षणासाठी आज मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत एकमत झाल्याचे वृत्त आहे. यासंदर्भातील ठरावावर सर्वपक्षीय नेत्यांनी सह्या केल्या, अशी माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनीही सरकारला सहकार्य करावे, अशी भावना काही नेत्यांनी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान सरकार टिकणारे आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बैठकीत ३२ नेते सहभागी झाले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांची देखील ही भूमिका आहे. मात्र याला थोडा वेळ द्यावा लागेल. दोन स्तरावर काम सुरु आहे. टिकणारं आरक्षण मिळावं यासाठी सर्व नेत्यांचे एकमत झाले आहे.

कायद्याच्या चौकटीत राहून टिकणारं आरक्षण देण्याबाबत चर्चा झाली. इतर समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारी भूमिका आहे. मराठा समाजाने संयम ठेवण्याची आवश्यकता आहे. सर्व नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोग वेगाने काम करत आहे. आंदोलनात हिंसा झाल्याने सर्वांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीत कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत एकमत झाले आहे. त्यामुळे सरकार आता ठोस पावले उचलणार आहे.

मुंबईत बोलावण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक झाली. मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी गावात आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन सर्व नेत्यांनी या बैठकीत केले आहे. तसेच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान मराठा आरक्षणाबाबत आयोग आपले काम करत आहे, त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल, असेही काही नेत्यांनी यामध्ये म्हटले.

सरकारने वातावरण खराब करू नये. मराठे हे लढण्यासाठी तयार आहेत. मराठे हे शांततेत आंदोलन करत आहेत. इंटरनेट बंद केल्याने मराठे घाबरत नाहीत. जालन्यातील इंटरनेट बंद करण्यामागे सरकारचे षडयंत्र असू शकते, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते सर्वपक्षीय बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. आम्ही संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत वाट पाहणार आहेत, त्यानंतर जबाबदारी सरकारची असेल, असेही ते म्हणाले.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

सरकार लक्ष देत नाही. सरकारला किती व कशासाठी वेळ पाहिजे, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर केला आहे. सरकार सरसकट आरक्षण देणार आहे का? तुम्हाला आता कशासाठी वेळ हवा आहे, हे सरकारने सांगावे. अन्यथा 5 मिनिटे वेळ मिळणार नाही. सरकारने काढलेला अध्यादेश आम्हाला मान्य नाही, तो रद्द करावा. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत उपोषण थांबवणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस यांनी इथे यावं, मराठे त्यांना अजिबात अडवणार नाहीत. मी चर्चेसाठी बोलावल पण ते आले नाहीत. आम्ही मनावर घेतलं, तर यांचा आवाज 5 मिनिटात बंद होईल” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. त्यांनी आज संध्याकाळपासून पाणी बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील सध्या समाजाच्या विनंतीला मान देऊन पाणी पितायत. सहाव्यादिवशी त्यांची प्रकृती ढासळली होती. पण आता पाणी पिल्यामुळे प्रकृती थोडी बरी आहे.

सरकारचा अध्यादेश आम्हाला मान्य नाही. वेळ घेऊन सरसकट आरक्षण देणार का?. आम्हाला अर्धवट आरक्षण नको. आरक्षण मिळेपर्यंत आमच आंदोलन थांबणार नाही” असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. “चर्चा करायची हे आंदोलनाला बसण्याआधी का नाही सांगितलं?. आठ दिवस रक्त जाळल्यानंतर यांना जाग आली. पण मी माझ्या समजासाठी तयार आहे. मराठा समाजाला गरम केलं जातं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “यांना का आणि कशासाठी वेळ पाहिजे. हे त्यांनी इथे येऊन महाराष्ट्राला सांगाव. त्यानंतर आम्ही विचार करु” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

 

मराठवाड्यात जुन्या नोंदी सापडलेल्यांना तत्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यानुसार आज पहिले प्रमाणपत्र धाराशीव जिल्ह्यात देण्यात आले. सुमीत माने यांच्या पंजोबाच्या दाखल्यानुसार त्यांना हे कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. पण, जर सर्व मराठा बांधवांना सरसकट प्रमाणपत्र मिळाले नाही तर मी हे प्रमाणपत्र वापस करणार असल्याचे माने यांनी म्हटले आहे.

निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मराठवाड्यातील निजामकालीन सुमारे पावणे दोन लाख नोंदी तपासल्या आहेत. यातून १० हजारांवर नोंदी ‘मराठा- कुणबी’, ‘कुणबी-मराठा’ अशा सापडल्या आहेत. १९६७ पूर्वीच्या या नोंदी असल्याने त्या एका नोंदीवर पुढील पाच पिढ्यांना प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. आता सापडलेल्या नोंदींचा लाभ सुमारे पाच लाख लोकांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी होणार आहे. समितीतील एका सदस्यानेही या माहितीला दुजोरा दिला.

आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे 30 वर्षीय दिव्यांग तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विलास कृष्णा क्षीरसागर असे या तरुणाचे नाव आहे. तालुक्यातील तारापूर येथील विलास हा मराठा आंदोलनामध्ये मागील काही दिवसांपासून सक्रिय होता. सोमवारी रात्री 11 वाजेपर्यंत तो आंदोलनस्थळी बसून होता. त्यानंतर रात्रीत त्याने आंदोलनस्थळाजवळ असलेल्या करंजीच्या झाडाला भगव्या शालीने गळफास घेतला.

You Might Also Like

पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण

मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस

सहा महिन्यांत पश्चिम विदर्भात ५२७ शेतक-यांची आत्महत्या

मुंबई : आकाशवाणी आमदार निवासातील कँटीनचा परवाना रद्द

उत्तेजक चाचणीत दोषी : रौप्यपदक विजेती कुस्तीपटू रितिका हुडा चार वर्षांसाठी निलंबित

TAGGED: #Important #decisions #all-party #meetings #SharadPawar #next #ChiefMinister #EknathShinde #DevendraFadnavis, #मराठाआरक्षण #सर्वपक्षीय #बैठक #महत्त्वपूर्ण #निर्णय #मुख्यमंत्री #एकनाथशिंदे #शरदपवार #उपस्थिती #देवेंद्रफडणवीस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हिंसाचारामागे कोण ? मनोज जरांगे पाटील वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात
Next Article शिष्टमंडळाला समजूत काढण्यात आले यश; जरांगे पाटलांचे उपोषण मागे, सरकारला दिले नवीन अल्टीमेटम

Latest News

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
सोलापूर July 10, 2025
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार
सोलापूर July 10, 2025
crime
सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू
सोलापूर July 10, 2025
पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण
महाराष्ट्र July 10, 2025
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर July 10, 2025
वडोदरा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर; बचावकार्य सुरू
Top News July 10, 2025
मुख्यमंत्री विदर्भाचा, पण काही कामाचा नाही – बच्चू कडू
Top News July 10, 2025
ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात, 2145 वैज्ञानिक ‘नासा’मधून पडले बाहेर
Top News July 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?