Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आलुरे गुरुजींचे निधन : आदर्श नितीमुल्याचं सह्याद्री म्हणजे आलुरे गुरूजी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
ब्लॉग

आलुरे गुरुजींचे निधन : आदर्श नितीमुल्याचं सह्याद्री म्हणजे आलुरे गुरूजी

Surajya Digital
Last updated: 2021/08/02 at 9:35 AM
Surajya Digital
Share
6 Min Read
SHARE

एखाद्याकडे आर्दश नितीमुल्य आसतात तरी किती ? तर काही ठराविक क्षेत्रातच आर्दश मुल्य असतात .पण ज्यांच्या कडे ठाई ठाई आर्दश नितीमुल्य सह्याद्री एवढे भरलेले आहेत अस व्यक्तीमत्व म्हणजे सि ना आलुरे गुरूजी ( बाबा ) आई वडिलांनी ,गुरूजनानी , थोरामोठ्यानी घालून दिलेली आर्दश शिकवण अंगीकारत आचरण करत चालत राहणे हा बाबांचा स्वभाव त्यामुळे त्याचा संग्रह होत होत ते आर्दशमुल्य सह्याद्री एवढे झालेत .कुंटूब ,समाज , शैक्षणिक क्षेत्र, राजकारण ,सहकार आशा अनेक क्षेत्रातील नितीमुल्याच दुसर नाव म्हणजे आलुरे गुरूजी .

 

आज महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी यांना मी आलुरे गुरूजी यांच्या जवाहर विद्यालय चा विद्यार्थी आहे याचा अभिमान वाटतो .आशा जवाहर विद्यालय ला गुरूजी नी घडवल ,वाढवल ,रूळवल त्याच्यावर एक एक संस्कारच नितिमुल्याच आभूष घातल म्हणून ते आज समाजच भूषण आहे . तस पाहिल तर आणदूर हे गाव खेडेगावच. एक जवाहर विद्यालय सोडल तर इतर कुठल्याही सुविधा नाहीत .पण सोलापूर ,उस्मानाबाद ,लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर या शहरातील शेकडो विद्यार्थी जवाहर विद्यालयाच्या वस्तीगृहात अथवा स्वतंत्र खोलीकरून राहत आसत.90 च्या दशाका पर्यत तर तुळजापूर तालुक्यातील 60 % विद्यार्थी हे जवाहर विद्यालयचे विद्यार्थी आसत . शाळेचा गणवेश हा डोक्यावर गांधी टोपी पांढरा शर्ट खाकी हाफ पँन्ट हा ड्रेस विद्यार्थीची एक ओळख होती शाळेच्या वेळेत सोलापूर ते उमारगा या रोडवरील जेवढ्या एस टी धावत त्या विद्यार्थीनी खचा खच भरून वाहत पाय ठेवण्यासाठी सुध्दा जागा नसत .आणि मी पण याच महाविद्यालयचा विद्यार्थी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे .

शाळेतील गुरूजन वर्ग हा आजही आई वडिला एवढा प्रिय आहे .शाळेतील शिस्त संस्कार ,आपलेपणा , आपुलकी , प्रेम हे गुरूकुला एवढच म्हटलं पाहिजे कारण या गुरूकुलाचे कुलगुरू आचार्य आलुरेगुरूजी होते त्यांनी एक एक अंत्यत गरजू हुशार संस्कारक्षम शिक्षकांचीच नियुक्ती केली होती.आणि त्यावर गुरूजीच संपूर्ण बारीक लक्ष आसत ते 1980 च्या कालखंडात आमदार होते त्या वेळी सुध्दा आणदूर येथे असले तर सकाळीच विद्यालयात प्रार्थना साठो येत .शाळेत स्वच्छता झालीय की नाही पाहत अनेक वर्गावर जात विद्यार्थीशी हितगुज करीत .वस्तीगृहात जात तेथील व्यवस्था पाहत शाळेच्या कुठल्या व्यवस्थेत ते सहभागी होत .म्हणूनच विद्यार्थीनां त्यांचा विद्यार्थी आसल्याचा अभिमान वाटतो.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यांनी घडविलेली कै ब्याळे गुरूजी नी व नरे गुरूजी ,कुंभार गुरूजी ,नाना कुलकर्णी , मुळे गुरूजी ,खोबरे गुरूजी ,कांबळे गुरूजी ,बिच्चे ,पाटील ,कबाडे गुरूजी हे सगळे उदाहरण दाखल आहेत आसे किती तरी गुरूजी ने समाजात लाखो विद्यार्थी ताट मानाने जगणारे विद्यार्थी घडविले.साने गुरूजीच्या विचाराचे संस्कार विद्यार्थीवर केले.हे सर्व करण्याचा नैतिक आधिकार आलुरे गुरूजी नी मिळविलेला होता म्हणून शक्य झाले का तर शाळेचा ,शिक्षणाचा बाजार त्यांनी मांडला नाही. होवू दिला नाही नव्हे तर अंत्यत गरीब कुंटूबातील पात्र लोकांना त्यांनी त्यांच्या कडे घरी जावून बोलावून घेऊन संस्थेत नोकरी लावली आशा शकडो कर्मचारी चे बाबा जगण्याचा श्वास आहेत .
राजकारणात बाबा नी तुळजापूर तालुक्याच आमदार म्हणून एक वेळ काम केलेले आहे त्या ही वेळी बाबांनी अनेक सार्वजनिक कामे केलीत.महाराष्ट्र विधानसभेत त्यांच्या वागण्याचा एक ठसा त्यांनी उमटवला होता,ज्यां खेळ्या जमत नाही त्यांचा टिकाव राजकारणात लागत नाही .बाबांना राजकीय खेळ्या कधी जमल्या नाहीत म्हणून मैदानी राजकारणात त्यांना फारस र्स्वास नव्हते ते जनतेच्या गोरगरिबाच्या मनात त्यांना स्थान होते . आजही तुळजापूर तालुक्यात आलुरे परिवार आशा आहे की त्यांना “कारण आणि मरण ” याची खबर मिळाली की ते त्या कार्यक्रमला हजर राहतातच .बाबा अणदूर मध्ये असले की परवा परवा पर्यत या कारणाला जात होते. तब्यतीमुळे जाणे शक्य होत नव्हते तरी ते घरातून कुणालातरी पाठवतच आसत.

 

जवाहर विद्यालयाच्या व स्वताच्या नावावर बाबा काही ही करू शकले असते शैक्षणिक क्षेत्रातील साम्राज्य उभा करू शकले आसते मात्र ते साने गुरूजी च्या विचाराचे नव्हे तर आचाराचे पाईक होते .
त्यांनी तुळजाभवानी साखर कारखाना ,लातूर सिध्देश्वर बँक चेअरमन , राज्यशिखर बँक चे पदाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे .कुठेही त्याचा त्यांनी अवडंबर केल नाही त्यांच्या सात्विकपणाची छापच त्यांनी या संस्थावर पाडली आहे. ते आमच्या कुंटूबाचे मार्गदर्शकच होते सुखा दुखाच्या कार्यक्रमात बाबा यायचे येणेगुर मार्गी कुठे जात आसतील वेळे प्रमाणे शक्य असेल तर अनेक वेळा ते घरी यायचे एखाद्याच सन्मान ते आशा पध्दतीने करीत .माझ्या मनात तर बाबा बदल लहानपणी पासूनच आत्मीयता होती परत मी जवाहर विद्यालय चा विद्यार्थी म्हणून अभिमान आहेच आस हे आत्मीक अभिमान निर्माण करणार संस्काराच विद्यापीठ होत. त्यांच्या कुंटूबातील रामदादा यांच माझ्यावर सतत लक्ष आसत मार्गदर्शन आसत
अनेक वेळा घरगुती , सार्वजनिक कार्यक्रमात प पू सदगुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या समवेत जाण्याचा योग आला बाबांची प पू गहिनीनाथ महाराज यांच्या वर श्रद्धा होती बाबा वाकून नमस्कार करते वेळी महाराज त्यांना म्हणायचे आसू द्या हो पण बाबा म्हणायचे “आपण धर्मपीठाचे आधिकारी आहात आपल्या जवळील विद्ववते मुळे जनतेच कल्याण होते मग आशा व्यक्ती समोर मी नतमस्तक होणारच ” महाराज सोबत ते खूप चर्चा करत.बाबा म्हणजे ” जेथे कर माझी जुळती जेथे दिवा ना पणती ” आसे होते दिवातील वात होवून समाजाला प्रकाश देणार हे दिव्य दिवा आज कायम स्वरूपी शांत झाल लाखो विद्यार्थीचे या पिढीतील साने गुरूजी लोप पावले आशा या महान विभूती च्या चरणी नतमस्तक व भावपूर्ण श्रद्धाजंली

– मेघराज बरबडे, लातूर

You Might Also Like

गृहकलह… शरद पवारांचे वारसदार कोण  ?

राजकारणाचे उद्योग; उद्योगाचे राजकारण

आघाडीत बिघाडी… काँग्रेस-शिवसेनेच्या नव्या दोस्तीची सुरुवात

‘सततची तोंडपाटीलकी’ नडली… अदृश्य महाशक्ती सुद्धा तितक्याच ताकदीने काम करतीय

लगाम लावाच…आता नाही सहन होत…

TAGGED: #Death #AlureGuruji #Sahyadri #ideal #values, #आलुरेगुरुजी #आदर्शनितीमुल्य #सह्याद्री #आलुरे #गुरूजी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माजी आमदार, शिक्षण महर्षी सि.ना.आलुरे गुरूजी यांचे पहाटे निधन
Next Article येथे किस कराल तर सावधान! आता ‘नो किसिंग झोन’

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?