Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तुम्ही मोदींसाठी जितके अपशब्द वापराल, तितकं कमळ अधिक फुलत जाईल – अमित शाह
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

तुम्ही मोदींसाठी जितके अपशब्द वापराल, तितकं कमळ अधिक फुलत जाईल – अमित शाह

admin
Last updated: 2025/08/29 at 5:53 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

दिसपूर, २९ ऑगस्ट. राहुल गांधी यांनी द्वेषाच्या राजकारणाची सुरुवात केली आहे. तुम्ही जितके अपशब्द मोदींसाठी वापराल, तितकं कमळ अधिक उंच फुलत जाईल”, असे विधान करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वापरण्यात आलेल्या अपशब्दांची तीव्र शब्दांत निंदा केली. अमित शहा सध्या आसामच्या दौर्‍यावर आहेत. आज, शुक्रवारी त्यांनी गुवाहाटी येथील राजभवनाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या ब्रह्मपुत्र युनिटचे उद्घाटन केले यावेळी ते बोलत होते.

अमित शहा म्हणाले, “या मंचावरून राहुल गांधींनी ज्या प्रकारे द्वेषाच्या नीच स्तराची सुरुवात केली आहे आणि पंतप्रधान मोदींच्या आईविषयी वापरलेले अपशब्द यांची मी मनापासून निंदा करतो. हा द्वेषपूर्ण राजकारण राहुल गांधींच्या सार्वजनिक जीवनाला अधःपाताच्या दिशेने घेऊन जाईल. पंतप्रधान मोदी जेव्हापासून सत्तेवर आले, तेव्हापासून सोनिया गांधी आणि इतरांनी काय काय नाही बोललं? अशा प्रकारच्या भाषेने तुम्हाला जनतेचा पाठिंबा मिळेल का? पुन्हा पुन्हा पराभव होत असूनही यांना समजत नाही.” शहा यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले, “तुम्ही जितके पंतप्रधान मोदींना अपशब्द बोलाल, तितकं कमळ अधिक बहरून फुलेल. जर कोणी राजकारणाला प्रदूषित करत असेल, तर देश कसा सुरक्षित राहील? संपूर्ण देश आश्चर्यचकित होऊन हे कृत्य पाहत आहे. सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. देशासाठी त्यांना माफी मागायला हवी आणि ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो.”

अमित शहा म्हणाले, “जेव्हा पूर्वोत्तर आणि आसामचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा पंतप्रधान मोदींचे हे ११ वर्षे सुवर्णाक्षरांनी लिहिले जातील. आज आसाममध्ये वेगाने विकास होत आहे. आसामचा विकास कायम राहील. आपण इंग्रजांनी बनवलेले अनेक जुने कायदे रद्द केले आहेत. आज प्रत्येक व्यक्तीला सन्मान मिळतो आहे. या ११ वर्षांत मोदींनी देशाच्या सुरक्षेसाठी मूलगामी काम केले आहे.”

You Might Also Like

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री

आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांनी घ्यावी – एकनाथ शिंदे

हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही – एकनाथ शिंदे

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी संकेतस्थळ

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जेव्हा भारताने पाणी सोडले तेव्हा मृतदेह तरंगत आले- पाक संरक्षणमंत्री
Next Article नांदेड – पालकमंत्र्यांनी दिले अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?