Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमोल जगताप आत्महत्या प्रकरणात शहरातील 5 सावकार अटकेत; भागीदारीच्या फिर्यादीवरुन अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारीसोलापूर

अमोल जगताप आत्महत्या प्रकरणात शहरातील 5 सावकार अटकेत; भागीदारीच्या फिर्यादीवरुन अटक

Surajya Digital
Last updated: 2020/07/28 at 9:59 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : अमोल जगताप आत्महत्या प्रकरणात पोलिसांना तपासात आणखी 12 लोकांची नावे निष्पन्न झाली असून त्यातील  5 जणांना आज मंगळवारी अटक  करण्यात आली आहे.  सावकाराच्या कर्जाला कंटाळून हांडे प्लॉट येथे राहणार्‍या अमोल जगताप याने आपल्या पत्नी आणि मुलांचा खून करून स्वतः आत्महत्या केली होती.

श्रीनिवास महांकाळी येलदी (वय 52, रा. शास्त्री नगर), कासिम नालबंद ( वय 36, शनिवार पेठ), दिलीप अजमेर गायकवाड (वय 38, रा. सेटलमेंट), किरण माणिक जाधव (वय 33 , रा. लिमयेवाडी), राहूल मारूती सर्वगोड (वय 42, रा. मोदी ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मंगळवारी आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी संतोष नरसिंग श्रीराम (रा. उमा नगरी, मुरारजी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. अमोल जगताप आणि संतोष श्रीराम यांच्यासह चौघे मिळून हॉटेल गॅलेक्सी चालवत होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

संतोष श्रीराम यांच्या फिर्यादीनुसार येलदी याने त्याला व अमोलला 7 लाख 50 हजार रूपये 6 टक्के व्याजाने, कासिम नालबंद याने 3 लाख 50 हजार 10 टक्के व्याजाने, दिलीप गायकवाडने 1 लाख 10 टक्के व्याजाने, किरण जाधव याने 3 लाख 10 टक्के व्याजाने तर दिलीप सर्वगोड याने 5 लाख 15 टक्के  व्याजाने दिले होते. या सर्वांना संतोष आणि अमोल दरमहा व्याज देत होता. काही रक्कम त्यांनी दिलीही होती.

मात्र उर्वरित 99 लाख 98 हजारांच्या वसुलीसाठी हे सर्वजण दोघांना फोनवरून धमकी देत होते. अनेकदा श्रीराम यांना पत्नीसमोर ठार मारण्याची धमकीही दिली होती. हे सावकार आपल्या कुटुंबाला धोका पोहचवतील म्हणून श्रीराम 11 डिसेंबर 2019 रोजी घरातून निघून गेला होता. तर त्याचा भागिदार अमोल जगताप याने आपल्या पत्नी आणि मुलांचा खून करून स्वतः आत्महत्या केली.

त्यानंतर श्रीराम सोलापुरात आल्यावरही राहुल सर्वगोड याने श्रीरामच्या पत्नीच्या मोबाईलवर फोन करून पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. श्रीराम यांच्या फिर्यादीनुसार या पाच सावकारांना स. पो.नि. पवळ यांनी मंगळवारी अटक केली. अमोल भोसले, सिध्दाराम बिराजदार, बंडू बिराजदार, दशरथ जाधव, अमोल गायकवाड, दशरथ कसबे, गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांना  प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तापडिया यांनी 31 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली  आहे. आरोपी दिलीप गायकवाड, राहुल सर्वगोड यांच्यातर्फे ऍड. रझाक शेख व ऍड. इस्माईल शेख यांनी तर सरकारतर्फे ऍड.संजय देवमाने यांनी काम पाहिले.

You Might Also Like

राजकीय विश्लेषक राजा माने यांना ‘शांतीदूत’ राज्यस्तरीय पुरस्कार

सोलापूर सीईओ जंगम यांनी शिक्षणाधिकार्यांवर चिडून सभागृह सोडले

भीमा नदीच्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

उजनी धरणाचा विसर्ग घटल्याने पंढरपूरमधील पुरधोका टाळता आला

सोलापूर जिल्ह्यात ४१५४ सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी; “एक गाव-एक गणपती” चालना

TAGGED: #अमोलजगताप #आत्महत्या #प्रकरण #येलदी #सावकार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबई – बंगळुरु हायवेलगत केदारवाडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
Next Article सुशांतच्या वडिलांनी दाखल केली फिर्याद; रियानेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

Latest News

भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी
देश - विदेश August 24, 2025
फिजीचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर; लष्करप्रमुख अल्जेरियाला रवाना
देश - विदेश August 24, 2025
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते” – सुप्रिया सुळे यांचा वादग्रस्त वक्तव्य
महाराष्ट्र August 24, 2025
गणेशोत्सवासाठी कोकणकडे धावपळ; रेल्वे आणि महामार्गावर प्रचंड गर्दी
महाराष्ट्र August 24, 2025
पूरपश्चात व्यवस्थापनासाठी पालकमंत्री पाटील यांनी दिले निर्देश
महाराष्ट्र August 24, 2025
नांदेडमध्ये पूरग्रस्तांसाठी खासदार गोपछडे यांनी २० लाख रुपयांची मदत जाहीर
महाराष्ट्र August 24, 2025
पालकमंत्री पाटील यांनी पूरबाधितांसाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले
महाराष्ट्र August 24, 2025
मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला आग; सर्व ४५ प्रवासी सुरक्षित बचावले
महाराष्ट्र August 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?