Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्रात १५ हजार पोलीस भरतीला मंजुरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

महाराष्ट्रात १५ हजार पोलीस भरतीला मंजुरी

admin
Last updated: 2025/08/12 at 7:27 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, 12 ऑगस्ट – महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे १५ हजार पदांच्या भरतीस राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गृह विभागाने मांडलेल्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर लवकरच जाहिरात काढून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. कोणत्या जिल्ह्यात किती पदांची भरती होणार याचा तपशील अद्याप जाहीर झालेला नाही. राज्यातील हजारो तरुणांच्या अपेक्षांना या निर्णयामुळे गती मिळाली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात पोलीस भरतीसह – राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ, सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासासाठी Viability Gap Funding देण्याचा निर्णय, तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध कर्ज योजनांमधील जामीनदार अटी शिथिल करून शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय यांचा समावेश आहे.

गेल्या दोन महिन्यांत राज्य पोलीस दलाने २०२२-२०२३ मधील १७,४७१ शिपायांच्या रिक्त पदांपैकी सुमारे ७०% भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे. १९ जून २०२४ पासून मैदानी आणि कौशल्य चाचण्या, तसेच लेखी परीक्षा घेण्यात आली. यातून ११,९५६ उमेदवारांची निवड होऊन नियुक्तीपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भरतीत पोलीस शिपाई ९,५९५, चालक पोलीस शिपाई १,६८६, बॅण्डस्मन ४१, सशस्त्र पोलीस शिपाई ४,३४९ आणि कारागृह शिपाई १,८०० पदांचा समावेश होता. या पदांसाठी १६ लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते.

You Might Also Like

कठोर परिश्रम केल्यास जग भारताचं ऐकेल – नितीन गडकरी

प्रताप सरनाईक यांनी मनोज जरांगेंची लातूरमध्ये सदिच्छा भेट

सोलापूर-मुंबई-दिल्ली विमान सेवा सुरू करण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

सामाजिक न्याय विभागात राज्यातील महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सकारात्मक चर्चा – संजय शिरसाठ

शासन वारकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभे राहील – संजय शिरसाठ

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दिव्यांग, अनाथ व ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
Next Article दिव्या देशमुख महिला स्पीड बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या उपांत्यपूर्व फेरीत

Latest News

कठोर परिश्रम केल्यास जग भारताचं ऐकेल – नितीन गडकरी
महाराष्ट्र August 14, 2025
प्रताप सरनाईक यांनी मनोज जरांगेंची लातूरमध्ये सदिच्छा भेट
महाराष्ट्र August 14, 2025
भटक्या कुत्र्यांवरील आदेशाला स्थगिती मागणीप्रकरणी निर्णय राखून ठेवला – सर्वोच्च न्यायालय
देश - विदेश August 14, 2025
चर्चेनंतर युद्ध थांबवले नाही तर रशियाला गंभीर परिणाम – ट्रम्प
देश - विदेश August 14, 2025
सर्वोच्च न्यायालयातर्फे माजी न्यायाधीश एल. नागेश्वर राव यांची बिहार क्रिकेट असोसिएशनचे लोकपाल म्हणून नियुक्ती
देश - विदेश August 14, 2025
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी औजार लॉटरीचा कार्यक्रम संपन्न
सोलापूर August 14, 2025
संजय राऊत यांनी वारकरी, धारकरी, नाथ संप्रदायाची माफी मागावी – नवनाथ बन
देश - विदेश August 14, 2025
सोलापूर जिल्ह्यातील ३२ हजार शेतकऱ्यांना ४० कोटींची भरपाई
सोलापूर August 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?