Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अर्णब गोस्वामींचा जामिन अर्ज फेटाळला; दिवाळी तळोजा कारागृहात की घरी? अलिबाग सत्र न्यायालय ठरवणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

अर्णब गोस्वामींचा जामिन अर्ज फेटाळला; दिवाळी तळोजा कारागृहात की घरी? अलिबाग सत्र न्यायालय ठरवणार

Surajya Digital
Last updated: 2020/11/09 at 7:01 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक झाली असून त्यांना स्थानिक कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अटकेविरोधात गोस्वामी यांनी हायकोर्टात धाव घेतली असून आज सोमवारी मुंबई हायकोर्टाने अर्णब यांचा अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळला आहे. त्यांना सत्र न्यायालयात जाण्याचे हायकोर्टाने सुचवले आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक न्यूज चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. अर्णब गोस्वाम यांनी उच्च न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, सोमवारी उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता त्यांना अलिबाग सत्र न्यायालयामध्ये होणाऱ्या निर्णयावरच अवलंबून राहावं लागणार आहे. शनिवारी उच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्देश देताना अर्णब गोस्वामी यांना सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. त्यासोबतच, अर्णब यांच्या अर्जावर ४ दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले होते.

आज उच्च न्यायालयाने जामीन अर्जच फेटाळून लावल्यामुळे अर्णब यांना आता अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टाकडून अर्णब यांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे अर्णब गोस्वामींची यंदाची दिवाळी तळोजा कारागृहात की घरी?, याचा फैसला आता अलिबाग सत्र न्यायालय करणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर अर्णब यांनी उच्च न्यायालयाचा निर्णय येण्याआधी काही वेळ आधीच अलिबाग सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शनिवारी अर्णब यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी तात्काळ जामीन देऊ शकत नाही असं नमूद करत न्यायालयाने सर्व बाजू ऐकून निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. मात्र, त्याचवेळी अर्णब जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात अर्ज करू शकतात, असं देखील सांगितलं होतं. त्यानुसार, शनिवारी राखून ठेवलेला निर्णय आज उच्च न्यायालयाने दिला असून जामीन अर्ज फेटाळल्याचं स्पष्ट केलं आहे. अर्णब यांच्याबरोरच या प्रकरणातील इतर दोघे आरोपी फिरोज शेख आणि नितीश सारडा यांचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

दरम्यान, अर्णब यांची पोलीस कोठडी मिळावी, यासाठी अलिबाग पोलिसांनी अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्या अर्जावर सत्र न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली आहे. सध्या अर्णब गोस्वामी तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, त्यांना जामिनासाठी अद्याप कोणत्याही कारागृहाने दिलासा दिलेला नाही.

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #अर्णबगोस्वामी #जामीनफेटाळला #दिवाळी #कारागृहकीघरी #अलिबागसत्रन्यायालय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण; सोशल मीडियावर #Chiranjeevi ट्रेंड
Next Article भाजपने पदवीधर – शिक्षक मतदारसंघाचे चार उमेदवार केले जाहीर

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?