Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कॅबिनेट मंत्र्यांवर बेछूट आरोप केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामीविरोधात ‘या’ खासदारांचे गृहमंत्र्यांना पत्र
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

कॅबिनेट मंत्र्यांवर बेछूट आरोप केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामीविरोधात ‘या’ खासदारांचे गृहमंत्र्यांना पत्र

Surajya Digital
Last updated: 2020/08/18 at 11:14 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : गेले काही दिवस बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणावरून पत्रकार अर्णब गोस्वामी वारंवार शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारून शिवसेनेलाच आरोपीच्या पिंज-यात उभे करीत आहेत. मुख्यमंत्री ठाकरेंचा एकेरी शब्दात उल्लेख केला जात आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अर्णब गोस्वामीवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी त्यांनी गृहमंत्र्यांना निवेदन दिले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अर्णब गोस्वामींची हे कुठल्याही पुराव्याशिवाय महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्र्यांवर बेछूट आरोप लावण्यापर्यंत मजल गेली आहे. या पूर्वीच बातम्या प्रसारित करताना राजकीय नेत्यांवर खासकरुन विरोधी पक्षांच्या नेत्यांवर वाईट शब्दांत आरोप केले होते. त्यामुळे उभा महाराष्ट्र अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्याची वाट पाहत आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी विनंती या पत्रातून खासदार अरविंद सावंत यांनी गृहमंत्र्यांना केली आहे.

अर्णब गोस्वामी अत्यंत वाईट पद्धतीने प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. काही लोकांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी गुन्ह्यासंदर्भात विभाजक आणि बेजबाबदार बातम्या खळबळजनक प्रसारित करुन अर्णब गोस्वामी समाजात तेढ निर्माण करुन लोकांना चिथावणी देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल, अशी भीती सावंत यांनी व्यक्त केली आहे.

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

TAGGED: #अर्णबगोस्वामी #बेछूटआरोप #शिवसेना #खासदार #गृहमंत्री #पत्र
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 नवे रूग्ण; 9 जणांचा मृत्यू
Next Article सांगलीत तब्बल 19 कोरोनाबळी तर 311रुग्ण; मृत्यू 249 तर कोरोनाग्रस्तांनी ओलांडला 7 हजाराचा आकडा

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?