Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाकिस्तानकडून रुग्णालय व शाळांवर हल्ले- कर्नल कुरेशी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पाकिस्तानकडून रुग्णालय व शाळांवर हल्ले- कर्नल कुरेशी

admin
Last updated: 2025/05/10 at 1:34 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 10 मे

(हिं.स.) : पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारताने केवळ पाकिस्तानातील काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले

होते. परंतु, पाकिस्तान सातत्याने शहरांना टार्गेट

करीत आहे. तसेच शुक्रवारी (9 मे रोजी) पाकिस्तानने भारतातील काही रुग्णालये आणि शाळांवर हल्ले केल्याची

माहिती भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग देखील उपस्थित होते.

याप्रसंगी कर्नल

सोफिया यांनी सांगितले की, पाकिस्तानने पंजाबमधील हवाई तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी

सैन्य सीमावर्ती भागात त्यांचे सैन्य हलवत असल्याचे दिसून आले आहे. लष्करी तळांना

लक्ष्य करण्याव्यतिरिक्त, पाकिस्तानने श्रीनगर, अवंतीपुरा आणि उधमपूरमधील वैद्यकीय सुविधांनाही लक्ष्य केले. पाकिस्तानी सैन्य पश्चिम सीमेवर सतत हल्ले करत आहे. त्यांनी भारताच्या

लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी ड्रोन, लांब पल्ल्याची

शस्त्रे, युद्धसामग्री आणि लढाऊ विमानांचा वापर केला आहे.

भारताने त्यांचे अनेक हल्ले निष्प्रभ केले आहेत.

पाकिस्तानने 26 हून अधिक ठिकाणी

हवाई मार्गाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे उधमपूर, भूज, पठाणकोट, भटिंडा येथील हवाई

दलाच्या तळांवर भारताची उपकरणे आणि जवानांना फटता बसला आहे. पाकिस्तानने पहाटे 1.40 वाजता पंजाबच्या हवाई तळाला लक्ष्य

करण्यासाठी हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर केला. याचबरोबर पाकिस्तानने भारतातील

आरोग्य सुविधा आणि शाळांवरही हल्ला केला. यासोबतच पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी आज, शनिवारी सकाळी श्रीनगरमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला, याला भारतीय सशस्त्र दलांनी प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. शुक्रवारी

रात्री आणि शनिवारी सकाळी पाकिस्तानने भारतीय सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये अनेक ड्रोन

हल्ले केले. परंतु, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने परतावून

लावले.

यावेळी परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान पसरवत असल्याचे स्पष्ट केले.

पाकिस्तानचे भारतीय पायाभूत सुविधांचे गंभीर नुकसान झाल्याचे दावे पूर्णपणे खोटे

असल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी धार्मिक

स्थळावर क्षेपणास्त्र डागल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यांचेही यांनी खंडन केले आणि

हे दावे हास्यास्पद असल्याचे सांगितले. पाकिस्तानने आपले सैन्य पुढे सरकवायला सुरुवात केली आहे. यामुळे तणाव आणखी वाढत जाणार असल्याचे संकेत आहेत. भारताचे पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष असून भारतीय सशस्त्र दल उच्च ऑपरेशनल तयारीत

आहेत आणि सर्व शत्रुत्वाच्या कृतींना प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यात आले आहे आणि योग्य प्रमाणात प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पाकिस्तानने योग्य

प्रतिसाद दिला तर हा तणाव न वाढवण्याचा प्रयत्न भारताकडून करण्यात येणार असल्याचे विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांबा सेक्टरमध्ये 7 घुसखोरांना कंठस्नान
Next Article मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिव्यदृष्टीतला अंत्योदय

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?