Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न : महाराष्ट्रातील जतमध्ये कर्नाटकने सोडले पाणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न : महाराष्ट्रातील जतमध्ये कर्नाटकने सोडले पाणी

Surajya Digital
Last updated: 2022/12/01 at 10:20 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सांगली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न ऐरणीवर आहे. दरम्यान कर्नाटकने आज महाराष्ट्रातील जत भागातील काही भागात पाणी सोडले आहे. कोणतेही आवर्तन जाहीर केले नसताना कर्नाटकने तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी सोडले आहे. यातून महाराष्ट्राला खाली दाखवण्याचा प्रयत्न केल्याची नागरिकांची भावना आहे.  Attempt to defeat Maharashtra: Karnataka left water in Maharashtra’s Jat

 

कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागात ४२ गावांच्या दाव्यावरून वातावरण चांगलेच तापलेले आहे. मात्र, या तापलेल्या वातावरणात कर्नाटकाकडून काल बुधवारी (ता. ३० नोव्हेंबर) तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तिकोंडी तलाव एकाच दिवसात ओहरफ्लो झाला आहे. शिवाय, दाव्याप्रमाणे कर्नाटक नैसर्गिकरित्या या वंचित गावाला न्याय देऊ शकतो, असे भासविण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून होत आहे.

 

महाराष्ट्राने पाणी योजनेच्या विस्तारित प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांची तत्वत: मान्यता दिली. असं असतानाही जतमध्ये अलिकडच्या काळात दिवसेंदिवस काही ना काही घडामोडी घडत आहेत. आजही दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जत दौर्‍यावर असतानाच कर्नाटकने सोडलेल्या पाण्याने पूर्व भागातील तिकोंडी तलाव तुडूंब भरून वाहू लागला असल्याचं समोर आलं आहे.

कोणतेही आवर्तन जाहीर केले नसताना कर्नाटकने तुबची बबलेश्‍वर योजनेतून पाणी सोडून महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला असल्याची संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

जतच्या सीमावर्ती भागातील 40 गावांवर कर्नाटकने हक्क सांगितला असताना पूर्व भागाचा प्रलंबित पाणी प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. जत पूर्व भागातील 65 गावांसाठी विस्तारित म्हैसाळ योजनेला राज्य सरकारने तत्वत: मंजुरी दिली आहे. ही योजना पूर्ण होईपर्यंत तातडीने पूर्व भागातील काही तलाव म्हैसाळ योजनेच्या पाण्यातून भरून घेता येउ शकतील का? याचा आढावा घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पाहणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी जत दौर्‍यावर होते.

 

कर्नाटकने सीमावर्ती भागासाठी तुबची बबलेश्‍वर योजना गतीने पूर्ण केली. या योजनेतून कर्नाटकातील इंडी आणि चडचणसाठी जत पूर्व भागातील तिकोंडीसह काही गावातून नैसर्गिक उताराने पाणी जाऊ शकते. याच स्थितीचा फायदा उठवत कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाने बुधवायपासून या योजनेचे पाणी यतनाळ ओढापात्रात सोडले. या पाण्यामुळे तिकोंडी तलाव आज गुरूवारी (ता.1 डिसेंबर) ओसंडून वाहू लागला आहे. या कृतीद्वारे सीमावर्ती भागास कर्नाटकच तातडीने पाणी देऊ शकते हे दाखविण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने केलाय.

दरम्यान, म्हैसाळ विस्तारित योजनेबाबत वस्तुस्थिती निदर्शक अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना शासनाने दिले आहेत. या आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी आज गुरूवारी जतचा पाहणी दौरा केला. जिल्हाधिकार्‍यांनी आज तिकोंडी तलावाची पाहणी केली, तसेच श्रीक्षेत्र गुड्डापूर येथे अधिकारी व ग्रामस्थांची बैठक घेउन उमदीचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी जतच्या भौगोलिक स्थितीची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍याकडून नकाशाद्वारे घेतली.

You Might Also Like

लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन; पुण्यात अंत्यसंस्कार

देशात पहिली टेस्ला कार दाखल; प्रताप सरनाईक बनणार पहिले ग्राहक?

उद्धव ठाकरेंचा दानवे यांना सल्ला – “पुन्हा या, पण आपल्या पक्षातूनच या”

उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव; देवेंद्र फडणवीस यांची चर्चेला उघड दार

मुंबई आणि उपनगरांना मुसळधार पावसाचा तडाखा; ऑरेंज अलर्ट जारी

TAGGED: #Attempt #defeat #Maharashtra #Karnataka #left #water .Maharashtra's Jat, #maharashtra #jatt, #कर्नाटकने #सोडले #पाणी, #महाराष्ट्र #डिवचण्याचा #प्रयत्न #सांगली #जत # कर्नाटक कने सोडले पाणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सिद्धेश्वर साखर कारखान्याने केला रास्ता रोको; चिमणी बचाव, कारखाना बचाव’च्या दिल्या घोषणा
Next Article Gold mines चंद्रपूर, सिंधुदुर्गात सोन्याच्या खाणी, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आमच्या काळात…

Latest News

लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन; पुण्यात अंत्यसंस्कार
महाराष्ट्र July 16, 2025
फौजा सिंग यांचा हिट अँड रन प्रकरणात एनआरआय अमृतपाल सिंग ढिल्लनला अटक
Top News July 16, 2025
देशात पहिली टेस्ला कार दाखल; प्रताप सरनाईक बनणार पहिले ग्राहक?
महाराष्ट्र July 16, 2025
Uddhav Thackeray's advice to Danve
उद्धव ठाकरेंचा दानवे यांना सल्ला – “पुन्हा या, पण आपल्या पक्षातूनच या”
राजकारण July 16, 2025
उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव; देवेंद्र फडणवीस यांची चर्चेला उघड दार
राजकारण July 16, 2025
भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध थांबले नसते तर पुढे अण्वस्त्र युद्ध झालं असतं – डोनाल्ड ट्रम्प
देश - विदेश July 15, 2025
निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा पुढे ढकलली
देश - विदेश July 15, 2025
पहलगाम हल्ला : आयएसआय व लश्कर-ए-तोयबाचा कट
देश - विदेश July 15, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?