Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: औरंगाबाद विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

औरंगाबाद विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

Surajya Digital
Last updated: 2021/01/07 at 1:52 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन राज्यात राजकारण रंगलं असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर काढावी, अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे. त्यासंबंधी एक सविस्तर पत्र मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदिप पुरी यांना लिहलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा चर्चिला जात आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं नामांतरास ठाम विरोध केल्यानंतर नामांतराचा मुद्दा अधिकच पेटला होता. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर झाला असून त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांना एक पत्र लिहलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळानं निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही संभागृहात मंजूर करण्यात आला आहे. नामकरणाबाबत मुख्य सचिव यांच्या स्तरावरुन केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.

* नामांतराच्या हालचाली सुरु

औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज असे नामांतर करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने अधिसूचना काढावी, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांना पाठवले आहे.  दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटवर आज औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला आहे. त्यामुळं ठाकरे सरकारकडून औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या हालचाली सुरु असल्याच्या चर्चा आहेत.

You Might Also Like

मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू

अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन

मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर मेघांची सावट

प्ले ग्रुप, नर्सरीवर सरकारची राहणार विशेष नजर

आमदार अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्षपदी

TAGGED: #औरंगाबाद #विमानतळाला #संभाजीमहाराजांचे #नाव #देण्यासाठी #मुख्यमंत्र्यांचे #केंद्राला #पत्र
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एकत्र जगता येत नसल्याने किमान एकत्र तर मरू म्हणत प्रेमी युगलाची आत्महत्या
Next Article उद्योगपती अनिल अंबानींना एसबीआयचा मोठा झटका!

Latest News

मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू
महाराष्ट्र August 25, 2025
अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र August 25, 2025
पंतप्रधान मोदी-फिजी पंतप्रधान राबुका यांची चर्चा; सात करारांवर स्वाक्षऱ्या
देश - विदेश August 25, 2025
देशात मुसळधार पावसाचा कहर; राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत
देश - विदेश August 25, 2025
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर मेघांची सावट
महाराष्ट्र August 25, 2025
प्ले ग्रुप, नर्सरीवर सरकारची राहणार विशेष नजर
महाराष्ट्र August 25, 2025
आमदार अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्षपदी
महाराष्ट्र August 25, 2025
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे लखनऊमध्ये भव्य स्वागत
देश - विदेश August 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?