Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आझाद मैदान दंगल : १३ वर्षांनंतरही वसुली नाही, कारवाई शून्य
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

आझाद मैदान दंगल : १३ वर्षांनंतरही वसुली नाही, कारवाई शून्य

admin
Last updated: 2025/08/13 at 4:40 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 13 ऑगस्ट – 11 ऑगस्ट 2012 रोजी मुंबईतील आझाद मैदानात घडलेली दंगल हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळाकुट्ट अध्याय मानला जातो. ‘अमर जवान ज्योती’ची विटंबना, पोलीस व प्रसारमाध्यमांच्या गाड्यांची जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड आणि महिला पोलीस व पत्रकारांवर हल्ले अशा गंभीर घटना या दंगलीत घडल्या. काही कोट्यवधी रुपयांची हानी झाल्याचे मानले जात असून, प्रशासनाने ती केवळ ₹36.44 लाख दाखवली आहे. आरोपींकडे मालमत्ता नसल्याचे कारण देत वसुली थांबवणे धक्कादायक असल्याची टीका हिंदु जनजागृती समितीने केली.

समितीने मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांना दिलेल्या निवेदनात, आरोपींवर दिवाणी दावे दाखल करून कायद्यानुसार कठोर शिक्षा करावी आणि कार्यक्रमातील मुख्य आयोजक रझा अकादमीकडून हानीभरपाई वसूल करावी, अशी मागणी केली. हीच मागणी केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडेही करण्यात आली आहे.

समितीने निदर्शनास आणून दिले की, दंगलीदरम्यान जखमी झालेले पोलीस शिपाई संतोष हांडे यांचा पुढील वर्षी मृत्यू झाला होता. त्यामुळे रझा अकादमी आणि तिच्या सहयोगी संघटनांवर भारतीय दंड विधान कलम 302 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला पाहिजे होता. 60 आरोपींपैकी अनेक जण सध्या पत्त्यावर उपलब्ध नाहीत किंवा मालमत्ता इतरांच्या नावावर दाखवून वसुली टाळली गेली आहे. तसेच महिला पोलिसांवरील अत्याचार प्रकरणांची सुनावणी तातडीने घेऊन दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणीही समितीने केली.

समितीचा आरोप आहे की, तत्कालीन काँग्रेस सरकारने मुस्लिम मतांसाठी रमजान ईदच्या काळात कारवाई टाळली होती. आता तरी पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी राजकीय फायद्या-तोट्याच्या पलिकडे जाऊन कठोर पावले उचलावीत, असे आवाहन करण्यात आले.

You Might Also Like

इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले

ऍड. राकेश किशोर यांची तात्पुरती नोंदणी रद्द

पंजाबमध्ये बब्बर खालसा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक

पंतप्रधान मोदींनी मुंबईत ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांची घेतली भेट

केदारनाथने गेल्या वर्षीचा विक्रम मोडला; भाविकांची संख्या १६.५६ लाखांवर

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सामाजिक न्याय विभागात राज्यातील महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सकारात्मक चर्चा – संजय शिरसाठ
Next Article बेकायदेशीर बेटिंग ऍप प्रकरणात सुरेश रैनाला ईडीची नोटीस

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?