Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुख्यमंत्री विदर्भाचा, पण काही कामाचा नाही – बच्चू कडू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

मुख्यमंत्री विदर्भाचा, पण काही कामाचा नाही – बच्चू कडू

admin
Last updated: 2025/07/10 at 4:21 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अकोला, 10 जुलै (हिं.स.)।

मुख्यमंत्री विदर्भाचा आहे पण काही कामाचा नाही कारण विदर्भातील शेतकऱ्यांना हा मुख्यमंत्री शेतीला वेळेवरती वीज देत नाही. सध्या रानातली पिके करपून जात आहेत. रात्री-अपरात्री केव्हाही लाईट येते त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत असेल तर मग हा विदर्भातील मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या काय कामाचा? असा सवाल करत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आता शेतकऱ्यांनी 14 तारखेला अंभोरा येथे रूमनं आणि लाठ्या काठ्या हातात घेऊन रस्त्यावर उतरा आणि सभेला या, असे आवाहन देखील कडू यांनी ग्रामस्थांना केले.

‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे,’ या निर्धाराने हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन माजी मंत्री बच्चू कडू यांनी ‘७/१२ कोरा करा’ यात्रेचा आजचा तिसरा दिवस असून ही यात्रा दारवा तालुक्यातील तळेगाव या गावात आज पोहचली. यावेळी बच्चू कडू यांनी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. बच्चू कडू म्हणाले की, जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही तो पर्यंत आपला लढा चालू राहणार आहे. शेतकरी हो हि सरकार नावाची व्यवस्था तुमच्या मेहनतीचा पैसा खात आहे आणि तुमच्या आपापसामध्ये जातीच्या धर्माच्या नावाखाली भांडणे लावून देत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकांच्या कधीच नादी लागू नका. आपली लढाई ही शेतीमालाला भाव मिळण्याची आहे, या लढाईत तुम्ही सहभागी झाला पाहिजे. ही भूमी वसंतराव नाईक यांची आहे. या भूमीने राज्यात हरित क्रांती आणली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा सातबारा सुद्धा याच भूमीतुन करणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले.

You Might Also Like

वडोदरा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर; बचावकार्य सुरू

ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात, 2145 वैज्ञानिक ‘नासा’मधून पडले बाहेर

मुंबईतील ३११ बेकर्‍या हरित इंधनात रूपांतरित करण्याकरिता हायकोर्टाची मुदतवाढ

मुंबई : आकाशवाणी आमदार निवासातील कँटीनचा परवाना रद्द

भारत आणि इंग्लंड तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर रंगणार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात, 2145 वैज्ञानिक ‘नासा’मधून पडले बाहेर
Next Article वडोदरा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर; बचावकार्य सुरू

Latest News

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
सोलापूर July 10, 2025
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार
सोलापूर July 10, 2025
crime
सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू
सोलापूर July 10, 2025
पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण
महाराष्ट्र July 10, 2025
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर July 10, 2025
वडोदरा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर; बचावकार्य सुरू
Top News July 10, 2025
ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात, 2145 वैज्ञानिक ‘नासा’मधून पडले बाहेर
Top News July 10, 2025
मुंबईतील ३११ बेकर्‍या हरित इंधनात रूपांतरित करण्याकरिता हायकोर्टाची मुदतवाढ
Top News July 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?