Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाविकास आघाडीतील नेते शेतीप्रश्नावर आमने-सामने; कृषी खातं झोपलं आहे की काय ? संतप्त सवाल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

महाविकास आघाडीतील नेते शेतीप्रश्नावर आमने-सामने; कृषी खातं झोपलं आहे की काय ? संतप्त सवाल

Surajya Digital
Last updated: 2020/08/23 at 4:16 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

अमरावती : “राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार गंभीर नाही. राज्यातील कृषी खातं झोपलं आहे की काय”, असा सवाल उपस्थित करत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला घरचा अहेर दिली आहे. शेतीप्रश्नावर महाविकास आघाडीतील नेते आमने-सामने आले आहेत.

विदर्भात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. सध्या सोयाबीन पीक संकटात सापडलं आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार परिसरात सोयाबीन पिकावर अज्ञात रोग आला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी खुद्द राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करुन त्वरित नुकसानग्रस्त झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश बच्चू कडू यांनी दिले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बच्चु कडू यांनी, ‘ ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे. त्याची लगेच पाहणी करुन पंचनामे केले जाणार आहे. पंचनामे केल्यानंतर तातडीने मदत दिली जाणार आहे,’ असे सांगितले. तर, पुढं त्यांनी शेतकऱ्यांच्या सद्याच्या परिस्थितीवरून सरकारलाच खडेबोल सुनावले. “राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार गंभीर नाही. आधी बियाणे बोगस निघालं. “राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार गंभीर नाही. आधी बियाणे बोगस निघालं. आता पिकावर रोग येतात आहे. त्यामुळे राज्यातील कृषी खातं झोपलं आहे की काय” असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.

राज्यमंत्री बच्चु कडू यांनी केलेल्या आरोपांवर आता कृषीमंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कृषी विभाग हे शेतकऱ्यांच्या प्रति गंभीर नाही, अशी कोणतीही परिस्थिती नाही. ज्या गोष्टी गोष्टी समोर येत असतात त्याचा निपटारा करण्याचे काम हे कृषी विभागाकडून केले जात आहे’, असा खुलासा भुसेंनी केला आहे.पूढे त्यांनी, ‘राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या काही ज्या सूचना आहे. त्यांचा विचार केला जाईल. बच्चू कडू यांनी जे आरोप केले त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल’, असंही स्पष्ट केले.

* तसे पाहिले तर दोघेही शिवसेनेचे

बच्चू कडू हे सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. २०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कडू यांनी शिवसेनेच्या कोट्यातून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांच्या राज्यमंत्री पदाची शपथ ३० डिसेंबर २०१९ रोजी घेतली आहे. त्याचवेळी दादा भुसे यांनी शिवसेनेकडून कृषीमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे दोघेही शिवसेनेचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #महाविकासआघाडी #आमनेसामने #भुसे-कडू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पुणेकरांसाठी सुखद वार्ता : पीएमपीएमएलची सेवा ३ सप्टेंबरपासून सुरू
Next Article कोरोनाच्या महामारीतही आयपीएलचा फिव्हरचा जोर; धोनी विरुद्ध शर्मा वाद रंगला, सेहवागने फटकारले

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?