Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बार्शीत जलमित्राने बियाण्यांपासून बनविल्या पर्यावरणपूरक राख्या; सणानंतर वृक्षारोपणासाठी होणार मदत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरशिवार

बार्शीत जलमित्राने बियाण्यांपासून बनविल्या पर्यावरणपूरक राख्या; सणानंतर वृक्षारोपणासाठी होणार मदत

Surajya Digital
Last updated: 2020/08/02 at 12:03 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बार्शी : कोरोनामुळे बाजारपेठेत गेल्यामुळे होणार्‍या संसर्गाचा धोका तसेच चीन बरोबर सध्या सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी राख्यांवर बहिष्काराचे होत असलेले आवाहन, या पार्श्वभूमीवर बार्शीतील जलमित्र संदीप पवार यांनी घरातच उपलब्ध असलेल्या वस्तूंचा योग्य वापर करत पर्यावरणपूरक राख्या बनविल्या आहेत.

एरवी रक्षा बंधन झाल्यानंतर सगळ्या राख्या या अखेर कचर्‍यातच जातात, मात्र पवार यांनी बनविलेल्या या राख्या या विविध बियाणेयुक्त असल्यामुळे सणाच्या आनंदाबरोबरच बहिणाबाई-भाऊरायाला पर्यावरण संतुलनाला मदत केल्याचे समाधान मिळणार आहे. संदीप पवार हे पाणी फाऊंडेशनच्या चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पाणी आणि वृक्षाचे परस्परावलंबन त्यांना चांगलेच ठाऊक आहेत. त्यामुळे राख्या तयार करताना इतर कोणत्याही शोबाज वस्तूंपेक्षा बियाण्यांचा वापर केल्यास सणानंतर हेच बियाणे वृक्षारोपणासाठी मदतीला येतील या विचाराने त्यांनी घरातील किचनमध्ये असलेल्या डाळी, तांदूळ, जिरी, मोहरी, गहू, त्याचप्रमाणे दोडका, कारले, भोपळा, शेवरी, भेंडी, करंजी, मेथी, शेवगा यांसारख्या सहज उपलब्ध होणार्‍या अनेक बिया वापरल्या.

राखी बांधायला लेस म्हणून जुन्या साडीचा कपडा वापरला. यात कुठंही प्लास्टिक, कलर किंवा निसर्गाला हानी पोचवणारी एकही गोष्ट त्यांनी वापरली नाही. ही राखी जर मातीमध्ये पुरून टाकली तर नक्कीच त्यामधील बियामधून रोपटे तयार होईल व त्याचा पर्यावरणाला व आपणाला नक्की फायदा होईल. त्यामुळे कोरोना संक्रमणापासून स्वतःला व कुटुंबाला दूर ठेवा. त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावा. असा संदेश देत त्यांनी अशा राख्या तयार करा, असे आवाहन केले आहे.

You Might Also Like

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

TAGGED: #बार्शी #जलमिञ #पर्यावरणपूरकराख्या #वृक्षरोपणासाठीमदत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांगलीत 12 मृत्यू तर नवीन पॉझिटिव्ह 156; रुग्णसंख्या 2 हजार 799 वर पोहोचली
Next Article महिला कॅबिनेट मंत्री कमला राणी वरुण यांचा कोरोनामुळे मृत्यू; योगींचा आजचा दौरा रद्द

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?