Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरसह चार तालुक्यातील लॉकडाऊन मध्यराञीपासून उठणार; माञ बार्शी तालुक्यात लॉकडाऊन वाढला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूरसह चार तालुक्यातील लॉकडाऊन मध्यराञीपासून उठणार; माञ बार्शी तालुक्यात लॉकडाऊन वाढला

Surajya Digital
Last updated: 2020/07/26 at 7:01 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूरसह 4 तालुक्यातील लॉकडाऊन आज रात्रीपासून उठणार आहे. मात्र संपूर्ण बार्शी तालुक्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मागच्या लॉकडाऊनपेक्षा आणि राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत हा दहा दिवसांचा लॉकडाऊन सोलापुरातील जनतेने यशस्वी केला. कोरोनामुळे राज्यावर मोठं संकट ओढावलं आहे. अशा या जीवघेण्या महामारीला पायबंद घालण्यासाठी चार महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थितीत दिवसेंदिवस आणखी बिकट होत चालली आहे. राज्यात लॉकडाउन कधी उठणार असे सवाल विचारले जात आहे. यातच सोलापूरचे पालकमंञी दत्ताञय भरणे यांनी हे उत्तर दिले. तसेच सोलापुरात आता कधीही लॉकडाऊन लावण्यात येणार नसल्याचेही सांगितले.

(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)

पालकमंत्र्यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, सोलापुरात लागू केलेल्या लॉकडाऊनचा किती परिणाम झाला हे आपल्याला आणखी आठ ते दहा दिवसांनी कळेल. तुम्हाला निश्चितच फरक पडलेला दिसेल. मागच्या लॉकडाऊनपेक्षा आणि राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत हा दहा दिवसांचा लॉकडाऊन सोलापुरातील जनतेने यशस्वी केल्याचे सांगितले. बार्शीमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून दररोज बार्शीतील उपायोजनांचा आढावा घेत आहोत. बार्शी तालुक्यातील लॉकडाऊन वाढविण्याची गरज आहे. ३१ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन असेल, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये लॉकडाऊन नसला तरी नियम तेच ठेवण्यात आले आहेत. सोलापूरमध्ये ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण आणि रुग्णांचे मृत्यू बार्शी तालुक्यात झाले आहे.

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #लॉकडाऊन #सोलापूर #बार्शी #मध्यराञीपासून
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिराळ्यात संभाव्य पूरस्थितीबाबत एनडीआरएफ टीमचे पोलीस व नगरपंचायत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
Next Article विदारकपणे खून करुन मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?