Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बोगस बियाणे, खते औषधी विकली जाणार नाही याची दक्षता घ्या – आ. प्रवीण तायडे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

बोगस बियाणे, खते औषधी विकली जाणार नाही याची दक्षता घ्या – आ. प्रवीण तायडे

admin
Last updated: 2025/05/05 at 5:01 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 5 मे (हिं.स.)

अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यात शेतकऱ्यांना बोगस बियाणे, खते व औषधी विकली जातात, अशा शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्या अनुषंगाने येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बोगस बियाणे, खते व औषधी विकली जाणार नाही याची कृषी विभागाने दक्षता घ्यावी, तसेच कृषी निविष्ठा विक्री संचालकांनी यासाठी सहकार्य करावे. केवळ दक्षता समित्या नेमूण शांत बसू नये. आवश्यकता भासल्यास स्वतः तपासणी करून, कृषी निविष्ठांची गुणवत्ता तपासावी. शेतकऱ्यांची फसवणूक होऊन नाडल्या जाणार नाही, याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश आ. प्रवीण तायडे यांनी चांदूरबाजार तालुका खरीपपूर्व कृषी आढावा बैठकीत केले. यावेळी ते बैठकीचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. ही आढावा बैठक तहसील कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली.सभेला तहसीलदार रामदास शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक सहल सातपुते, अधिकारी उपविभागीय कृषी उज्ज्वल आगरकर, गटविकास अधिकारी नारायण आमझरे, पं.स. कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र देशमुख उपस्थित होते.

यावेळी कृषी सहाय्यक सतीश निमकर यांनी फळबाग लागवड व माधव देशमुख यांनी वनराई बंधारे योजनेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना आमदारांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. बैठकीचे प्रास्ताविक कृषी अधिकारी फाल्गुनी ननीर यांनी केले. त्यांनी खरीप नियोजन व कृती विभागाच्या विविध योजनांची तपशीलवार माहिती दिली. आढावा बैठकीचे संचालन जयश्री चव्हाण, तर आभार प्रदर्शन सुनील तेलखेडे यांनी केले. बैठकीला शेतकऱ्यांसह कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी तथा भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतीच्या बांधावर जाऊन सुक्ष्म नियोजन करा

याप्रसंगी बोलताना आमदार म्हणाले, कृषी विभागाने शेतक-यांना त्यांच्या योजनांचा शंभर टक्के लाभ, तसेच योजनेचा पूर्ण मोबदला शेतकऱ्यांना द्यावा. यावर्षीचा खरीप व रब्बी हंगाम शेतकऱ्याना कसा फायदेशीर खेल यासाठी बांधावर जावून खरीप हंगामाचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश ही आ. प्रवीण तायडे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याला दिलेत.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अंबा एक्सप्रेस सीएसटीपर्यंत चालविण्यात यावी – नवनीत राणा
Next Article चिनी फॅक्ट्रीतील हिंसक रोबोटचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, दोघे गंभीर जखमी

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?