सोलापूर, 13 मे (हिं.स.)।जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांचा विकास करण्यासाठी चेन्नई येथील खासगी संस्थेमार्फत काम सुरू केले आहे. तसेच जिल्ह्यातील दुष्काळ संपविण्यासाठीच मी खासदार झाले आहे, असे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.मंगळवेढा तालुक्यातील शिरसी आणि गोणेवाडी या गावी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी खा. प्रणिती शिंदे बोलत होत्या. यावेळी ग्रामस्थांची निवेदने स्वीकारून त्यांच्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.मंगळवेढ्यातील २४ गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी खासगी संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या कामांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.