पुणे : “संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं” असं म्हणत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अप्रत्यक्षपणे नेत्यांचे कान टोचले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गुरू साहिब यामधील संत नामदेव या विशेष आवृत्तीचे त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यानंतर राज्यपालांनी संतांच्या कार्याबाबत गौरवोद्गार काढले. राजा बदलले असतील, राज्य लहान-मोठे बनले असतील, काही राज्यांचे तुकडे ही झाले असतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र देशाच्या हृदयातील आत्म्याचे तुकडे कधीच झाले नाहीत. याच संतांमुळं आपली संस्कृती आणि आत्मा जीवंत आहे. संतांच्या या कार्यामुळेच आपला देश वाचलाय. असे गौरवोद्गार काढतानाच “संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं” असं राज्यपालांनी नमूद केलं.
आजकाल मीच गुरू, मीच महात्मा असं म्हणणारे स्वतःची पूजा करावी म्हणून धिंडोरे पीठतात. त्यांना ही राज्यपालांनी शालजोडे लगावले. संत नामदेव, गुरू गोविंद सिंग यांसह देशातील प्रत्येक संतांनी दिलेली शिकवण सर्वांनी अंमलात आणावी असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं.