Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतक-यांचा ‘भारतबंद’ला पाठिंबा नाही, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेशHot News

शेतक-यांचा ‘भारतबंद’ला पाठिंबा नाही, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

Surajya Digital
Last updated: 2020/12/07 at 9:29 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

गांधीनगर : गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन सुरू आहे. आंदोलन चिघळत असून उद्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. परंतु, गुजरातमध्ये अशा प्रकारचा कोणताही बंद पाळला जाणार नाही, असं मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी स्पष्ट केली आहे.

केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात बैठका आणि चर्चांचे सत्र सुरू आहे. पण अद्याप या बैठकांमधून तोडगा निघालेला नाही. हळूहळू आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त होताना दिसत असून विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळीदेखील लवकरच या मुद्द्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गुजरातमधील शेतकरी आणि APMC मधील विविध व्यापारी यांचा भारत बंदला पाठिंबा नाही. त्यामुळे गुजरातमध्ये ८ डिसेंबरला असा कोणताही बंद पाळण्यात येणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे की उद्याचा हा बंद अयशस्वी ठरेल. जर कोणी बळजबरी करून दुकाने किंवा इतर आस्थापने बंद पाडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. सरकारच्या वतीने मी हमी देतो की राज्यात कोठेही हिंसक घटना घडणार नाही. आणि मुद्दाम कोणी तसाच प्रयत्न केला तर त्याला योग्य ते शासन केले जाईल”, अशी माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी दिली.

* विजय रूपाणींचा गंभीर आरोप

“नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पारित केलेल्या कायदांना जो विरोध सुरू आहे तो शेतकरी आंदोलनाचा विरोध नसून त्यापाठीमागून राष्ट्रीय आणि राजकीय आंदोलन उभं केलं जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. म्हणूनच सर्व विरोधी पक्ष या आंदोलनाचा पाठिंबा देत आहेत. काँग्रेसने २०१९ च्या जाहीरनाम्यामध्ये APMC कायदा संपुष्टात आणण्याचं वचन दिलं होते. आता तेच भाजपाचं सरकार करत असताना राहुल गांधी शेतकऱ्यांची माथी भडकवण्याचं काम का करत आहेत?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

You Might Also Like

पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा

न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार

TAGGED: #शेतक-यांचा #भारतबंद #पाठिंबानाही #गुजरात #गंभीर #आरोप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माजी खासदार, ‘लेडी अमिताभ’ विजयशांती भाजपमध्ये
Next Article विजेचा शॉक लागून मार्डीत युवकाचा मृत्यू

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?