Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारत बायोटेकचा प्रकल्प नागपुरातून पुण्यात वळवला, भाजपचा आरोप
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

भारत बायोटेकचा प्रकल्प नागपुरातून पुण्यात वळवला, भाजपचा आरोप

Surajya Digital
Last updated: 2021/05/18 at 1:19 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : कोव्हॅक्सिन लशीचे उत्पादन करणाऱ्या भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्यात उभारला जाणार आहे. मात्र हा प्रकल्प नागपुरात होणार होता, पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तो आपल्या जिल्ह्यात वळवला, असा आरोप भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे. पण अजित पवार यांनी हा आरोप फेटाळला. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच या प्रकल्पाला पुण्यात जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.

चक्रीवादळ मंदावलं पण धोका कायम; अतिवृष्टीचा इशारा https://t.co/BAA5hWD00E

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021

हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीला पुण्यात लस निर्मिती प्रकल्पासाठी जागा देण्यात आली असून, सरकारने २८ एकर जागा कंपनीला हस्तांतरित केली आहे. त्याचबरोबर आवश्यक यंत्रसामग्रीसह इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. दरम्यान, या भारत बायोटेकच्या पुण्यातील प्रकल्पावरून भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. प्रकल्प विदर्भात होणार होता, मात्र पवारांनी तो पुण्याला पळवला, असं खोपडे यांनी म्हटलं आहे.

खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचे वक्तव्य, गोमुत्र प्यायल्यामुळे मला कोरोना झाला नाही #MP #भाजपा #खासदार #statment #वक्तव्य #साध्वी #कोरोना #CoronaPositive pic.twitter.com/dLBgfMbEO9

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना हा आरोप केला आहे. “नागपूरमधील मिहान परिसरात सिरम आणि भारत बायोटेकला निमंत्रित करण्यात आले होतं. भारत बायोटेकची इन्स्टिट्यूट स्थापन करण्यासाठी एक समिती स्थापन करम्यात आली होती. तसेच सादरीकरण (प्रेझेंटेशन) करण्याचे निर्देशही दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही मिहान प्रोजेक्टबद्दल माहिती होती. असं असतानाही विदर्भावर अन्याय करणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाबाबत त्यांनी शब्दही काढला नाही,” असं खोपडे म्हणाले.

येत्या रविवारी एनईएफटी सुविधा काही तासांसाठी असणार बंद #NEFT #surajyadigital #एनईएफटी #stop #बंद #service #RBI #सुराज्यडिजिटल #fewhours pic.twitter.com/jgB51aSYZp

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021

“नवे प्रकल्प आणण्याची हिंमत नसलेल्या विदर्भातील नेत्यांनी किमान आलेले प्रकल्प थांबवण्याची सुद्धा हिंमत दाखवली नाही. विदर्भाच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प आणण्यासाठी अधिकारी धडपड करतात. मात्र त्यांना राजकीय स्थान मिळत नाही. त्यामुळे ते पळविले जातात. ही विदर्भासाठी दुर्दैवी बाब असून, पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह काँग्रेसचे नेते गप्प का बसले?; असा सवाल खोपडे यांनी केला आहे.

सोलापूर ग्रामीणमध्ये शुक्रवारपासून दहा दिवस कडक लॉकडाऊन, सर्व बंद https://t.co/oZGXUbB6cJ

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

TAGGED: #Bharat #Biotech #diverted #Nagpur #Pune #BJP #alleges, #भारत #बायोटेकचा #प्रकल्प #नागपुरातून #पुण्यात #वळवला #भाजपचा #आरोप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चक्रीवादळ मंदावलं पण धोका कायम; अतिवृष्टीचा इशारा
Next Article दोन जहाजांच्या मदतीसाठी नौदलाची धाव, 146 जणांना वाचवले

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?