Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बिहार विधानसभा : पहिल्या टप्प्यात 53.54 टक्के मतदान; राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

बिहार विधानसभा : पहिल्या टप्प्यात 53.54 टक्के मतदान; राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Surajya Digital
Last updated: 2020/10/28 at 9:42 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान बुधवारी शांततेत पार पडले. संध्याकाळच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एकूण 53.54 टक्के झाल्याचे समोर आले. बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी 71 मतदारसंघांमध्ये आज मतदानाची प्रक्रिया पार पडली.

2015 च्या विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 54.94 टक्के मतदान झाले होते. मात्र, कोरोनाचे सावट लक्षात घेता यंदा पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी समाधानकारक असल्याचे मानले जात आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या होत्या. कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर्स अशी जय्यत तयारी करण्यात आली होती. तसेच कोरोना रुग्ण आणि दिव्यांगांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची मुभा देण्यात आली होती.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्याचे मतदान आज पार पडले. आता उर्वरित दोन टप्प्यांतील मतदान अनुक्रमे 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबरला पार पडेल. यानंतर 10 नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

दरम्यान, पहिल्या टप्प्याचे मतदान सुरु असतानाच आज बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरभंगा, मुजफ्फरपूर आणि पाटण्यात प्रचारसभा घेतल्या. तर वाल्मिकीनगर आणि कुशेश्वर येथे राहुल गांधींच्या सभा पार पडल्या.

* राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज सकाळी मतदानाला सुरुवात होताना एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी मतदारांना न्याय, रोजगार आणि शेतकरी-कामगारांसाठी महाआघाडीला मतदान करण्याची मागणी केली. ‘इस बार न्याय, रोजगार, किसार-मजदूर के लिए आपका वोट सिर्फ महागठबंधन के लिए. बिहार के पहले चरण के मतदान की आप सभी को शुभकामनाएँ’ असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

मात्र, मतदानाच्यादिवशी एखाद्या पक्षाला मतदान करा असं सांगून राहुल गांधी यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

You Might Also Like

कपिल शर्माच्या हॉटेलवरील हल्ल्यात खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात

अमेरिकेकडून लेखी हमी मिळेपर्यंत अणु चर्चा नाही -इराण

गुजरात पूल दुर्घटना : मृतांचा आकडा १७ वर तर ३ जणांचा शोध अजूनही सुरू, ४ अधिकारी निलंबित

इराणचे नेते खामेनेई यांचे सल्लागार जवाद लारीजानी यांची ट्रम्प यांना उघडपणे धमकी

अमेरिकेने लादलेल्या ५० टक्‍के ‘टॅरिफ’वर ब्राझीलच्या राष्ट्रध्यक्षांनी ट्रम्प यांना दिले आव्हान

TAGGED: #बिहार #विधानसभा #पहिलाटप्पा #मतदान #राहुलगांधी #निवडणूक #आयोग #तक्रार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हे मी 30 वर्षांपासून ऐकतोय; भाजपला दूर ठेवण्यासाठी आपण एकत्र आल्याचा सल्ला
Next Article दिलासा : मराठा आरक्षणाची सुनावणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग

Latest News

कपिल शर्माच्या हॉटेलवरील हल्ल्यात खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात
देश - विदेश July 11, 2025
अमेरिकेकडून लेखी हमी मिळेपर्यंत अणु चर्चा नाही -इराण
देश - विदेश July 11, 2025
गुजरात पूल दुर्घटना : मृतांचा आकडा १७ वर तर ३ जणांचा शोध अजूनही सुरू, ४ अधिकारी निलंबित
देश - विदेश July 11, 2025
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
सोलापूर July 10, 2025
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार
सोलापूर July 10, 2025
crime
सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू
सोलापूर July 10, 2025
पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण
महाराष्ट्र July 10, 2025
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर July 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?