Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बिबट्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आष्टी, करमाळा, कर्जतमध्ये दहशत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

बिबट्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आष्टी, करमाळा, कर्जतमध्ये दहशत

Surajya Digital
Last updated: 2020/12/05 at 5:12 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

कर्जत : कर्जत तालुक्यातील शेगुड जवळ करमाळा तालुक्यातील कुंदेवाडी येथील एका 35 वर्षीय तरुणावर बिबट्याने हल्ला केला असून त्यास ओढत जवळच्या शेतात नेले, या युवकांचे रक्त एका जागी आढळले असून त्यानंतर त्याचा मृतदेहही आढळला. यामुळे शेगुड परिसरात खळबळ उडाली आहे.

विजयदीप जगताप यांनी कर्जत- करमाळा रस्त्यावर राधेश्याम मंगल कार्यालयाजवळ बिबट्या स्वत: पाहिला असल्याची माहिती दिली आहे. पाथर्डीत तीन मुलांचे बिबट्याने बळी घेतले असून यापूर्वी पाथर्डीत चार बिबटे पकडण्यात आले. बिबट्यांचा धुमाकूळ आता इतर तालुक्यात सुरू आहे. बीड जिल्ह्यात आष्टीत बिबट्याने तीन बळी घेतले आहेत. पाथर्डीतील बिबटे आष्टी, करमाळा मार्गाने आता कर्जतमध्ये गेले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या पार्श्वभूमीवर आज भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर यांनी वन विभागाचे अधिकारी छबिल वाढ यांच्यासोबत चर्चा केली व पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा वीज पुरवावी, त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी अंधारात पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागणार नाही, स्वत:चा जीवही धोक्यात घालावा लागणार नाही, असे सांगितले.

तालुक्याच्या हद्दीत बिबट्याने प्रवेश केल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या वेळी शेतकऱ्यांनी, सध्या पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतामध्ये जावे लागते यामुळे तर असे हल्ले होऊ लागले तर जीव धोक्यात येत आहे आणि आम्ही घाबरून गेलो आहोत, त्यामुळे वीज पुरवठा शेतीसाठी दिवसा करावा अशी मागणी केली. यावर खेडकर यांनी तातडीने कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

सध्या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. जर पाणी दिले नाही तर पिके जळून जातील आणि बिबट्याने हल्ला केला तर शेतकऱ्यांचा जीव जाईल त्यामुळे याबाबत तातडीने गांभीर्याने विचार करून तत्काळ शेतीसाठी दिवसात पूर्ण दाबाने वीज सोडावी अशी मागणी केली आहे.

You Might Also Like

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

TAGGED: #बिबट्याच्या #हल्ल्यात #तरुणाचा #मृत्यू #आष्टी #करमाळा #कर्जत #दहशत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माऊलींचा संजीवन समाधी सोहळा; आळंदीत पंढरपूरप्रमाणेच राहणार संचारबंदी
Next Article ‘आधार’ विना निराधार असलेल्या दिव्यांग रुपालीला २७ वर्षांनी मिळाला न्याय

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?