मुंबई : राज्यात नुकतंच चक्रीवादळ धडकलं. त्यातच आता मोठी गुडन्यूज समोर आली आहे. 21 तारखेला अंदमानात मान्सून धडकणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं होतं. त्यानुसार मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. 1 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यानंतर 10 जूनपर्यंत तळकोकणात मान्सून दाखल होऊ शकतो.
चिपको आंदोलनाचे प्रणेते, पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांचं कोरोनाने निधन https://t.co/jed7HdfJom
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 21, 2021
तोक्ते चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीला धडकल्यानंतर सर्वजण मान्सूनच्या प्रतीक्षेत होते. अनेक जणांनी मान्सूनच्या आगमनाला उशीरा होईल, अशी चिंता व्यक्त केली होती. पण दक्षिण-पश्चिम मान्सून अंदमान-निकोबार येथे दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय मौसम विज्ञान विभागाने दिली आहे. त्यामुळे लवकरच मुख्य भूभागात मान्सून पोहोचण्याचे संकेत दिले आहेत.
राजीव गांधींची हत्या… आज पुण्यतिथी (ब्लॉग) https://t.co/qheRJr0ABf
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 21, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आयएमडीने सांगितले की, 21 मे रोजी नैऋत्य मान्सून बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात, निकोबार बेटे, संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात दक्षिण पश्चिम मान्सून आला आहे.
करोनामुळे आशिया कप २०२१ स्पर्धेचं आयोजन रद्द https://t.co/S0iPNFNTpi
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 21, 2021
1 जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होणार असा अंदाज काही दिवसांपूर्वी आयएमडीने वर्तवला होता. पण आता अंदमान-निकोबारमध्ये मान्सून पोहोचला असल्यामुळे केरळमध्ये मान्सून १ जून अगोदरच म्हणजेच ३१ मे दाखल होण्याचा अंदाज आता आयएमडीने व्यक्त केला आहे.
पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी, विनम्र अभिवादन #गांधी #अभिवादन #surajyadigital #सुराज्यडिजिटल #राजीवगांधी #RajivGandhi pic.twitter.com/D4IbMDF9xV
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 21, 2021