Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजपचा आत्मविश्वास वाढला, मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात दोन उपमुख्यमंत्री पदासह मागितली महत्त्वाची खाते
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

भाजपचा आत्मविश्वास वाढला, मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात दोन उपमुख्यमंत्री पदासह मागितली महत्त्वाची खाते

Surajya Digital
Last updated: 2020/11/12 at 9:48 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडीमध्ये (एनडीए) भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. आता आधी दिलेल्या शब्दानुसार विद्यमान मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीशकुमार यांच्याकडेच राज्य सरकारचे नेतृत्व राहील, याबाबत भाजपमध्ये कोणतेही दुमत नाही. मात्र, त्या मोबदल्यात भाजपला २ उपमुख्यमंत्रिपदांसह महत्वाची खाती हवी आहेत.

तसेच नव्या मित्रपक्षांनाही मंत्रिमंडळात सामावून घ्यायचे आहे. त्यादृष्टीने वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. बिहारमध्ये भाजपने ७४ तर जेडीयूने ४३ जागा जिंकल्या. राज्यात मित्रपक्षापेक्षा जास्त जागा जिंकण्याची ही भाजपची पहिलीच वेळ. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाने ३१ जागा जास्त जिंकल्या. मतांमध्येही चार टक्क्यांनी वाढ झाली.

भाजपने जदयूपेक्षा जास्त जागा जिंकल्या. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी दिलेला शब्द भाजप पाळणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, नितीशकुमार यांना बदलण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे सुशील मोदी यांनी स्पष्ट केले. बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनीही हीच भूमिका घेतली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* भाजपला हवी महत्त्वाची खाती  

भाजप आणि जेडीयूला आता सत्तेतील वाट्याचा प्रश्न सोडवायचा आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना कायम ठेवायचे झाल्यास भाजपकडून दोन उपमुख्यमंत्रिपदांची मागणी होऊ शकते. तसेच भाजपला महत्त्वाची खाती हवी आहेत,
विकासशील इन्साफ पार्टी (व्हीआयपी)लाही मंत्रिमंडळात सामावून घ्यायचे आहे. तसेच काँग्रेसच्या १९ आमदारांनाही फोडण्याची भाजपची योजना आहे.

* नितीश कुमारांचा भाजपकडे आग्रह

निवडणुकीत सातत्याने त्यांच्याविरोधात भूमिका घेणाऱ्या लोकजनशक्ती पार्टीला एनडीएमध्ये स्थान देऊ नये, यासाठी नितीशकुमार यांनी भाजपच्या पक्षनेतृत्वाकडे आग्रह धरला आहे.  चिराग यांच्या भूमिकेमुळे नितीशकुमारांना किमान २० जागांवर पराभव पत्कारावा लागला. विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर नितीशकुमारांना जायचे नाही. हे सर्व मुद्दे सुटल्याशिवाय जेडीयू केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही.

* राय यांना राज्यात पाठवण्याची योजना

प्रचाराची धुरा सांभाळून मोठा हातभार लावणारे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देऊन राज्यात परत पाठविण्याची भाजपची योजना आहे. त्यांनाच पुढे मुख्यमंत्रिपदी बसविण्याची चर्चा सुरु आहे. राय यांनी यावेळी २०० पेक्षा जास्त सभा घेतल्या. पक्षाचा ‘यादव’ चेहरा म्हणून ते समोर आले.

You Might Also Like

शरद पवार गट एका विचारधारेवर चालणारा पक्ष – प्रा. डॉ.हेमंत देशमुख

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

TAGGED: #भाजप #आत्मविश्वास #वाढला #मुख्यमंत्री #पदाच्याबदल्यात #दोनउपमुख्यमंत्री #महत्त्वाचीखाते
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कच्च्या मालाच्या वाहतुकीत कपात झाल्याने कमी दरात वीजपुरवठा; एनटीपीसी दोन नव्या चिमण्यांची करणार उभारणी
Next Article “जे लोक आमचा सामना करु शकत नाहीत त्यांनी सध्या नवा मार्ग अवलंबलाय”

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?