वसई, 17 जून (हिं.स.)। ‘सेवा हेच संघटन’ या सूत्रावर राज्याच्या कानाकोपऱ्यातील आणि तळागाळातील जनतेच्या सेवेसाठी भारतीय जनता पार्टी सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले.
वसई विधानसभा मतदारसंघातील जनतेशी थेट संवाद साधता यावा आणि सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविता याव्यात या उद्देशाने वसई पश्चिम येथे आ. स्नेहा दुबे-पंडित यांचे जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, खा. डॉ. हेमंत सवरा, आ. निरंजन डावखरे, आ. राजन नाईक, आ. हरिश्चंद्र भोये, विवेक पंडित, भाजपा वसई विरार जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.