Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “भाजपच एक नंबरचा पक्ष, इतर पक्षांच्या तुलनेत आम्ही खूप पुढे गेलो”
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

“भाजपच एक नंबरचा पक्ष, इतर पक्षांच्या तुलनेत आम्ही खूप पुढे गेलो”

Surajya Digital
Last updated: 2021/01/18 at 5:57 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीच्या अंतिम निकालाकडे सर्वाचं लक्ष लागले आहे. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण वा पश्चिम महाराष्ट्र असेल. सगळ्या भागात भाजप एक नंबरचा पक्ष झाला आहे. तसेच लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे. तिघे एकत्र येऊनही भाजप एक नंबरला येत यावरुन हेच दिसत असल्याचे म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाच एक नंबरचा पक्ष झाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे असून तिघे एकत्र येऊनदेखील भाजपा एक नंबरला येतो यावरुन हेच दिसतं असल्याचे एका वृत्त वाहिनीला बोलताना म्हणाले.

“ज्याप्रकारे भाजपाला लोकांनी सर्मथन दिलं आहे त्याचा मला अतिशय आनंद आहे. आम्ही समर्थन दिलेले सगळे पॅनल ग्रामपंचयातीमध्ये चांगला विजय मिळवत आहेत. विशेष म्हणजे विदर्भ, मराठवाडा. उत्तर महाराष्ट्र, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल… सगळ्या भागात भाजपा एक नंबरचा पक्ष झाला आहे. इतर पक्षांच्या तुलनेत आम्ही खूप पुढे गेलो आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये आम्ही सर्व जागा जिंकल्या आहोत. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“लॉकडाउनच्या काळात पाठीशी उभे राहिलेले मोदी लोकांनी पाहिले, तर दुसरीकडे शेतकरी, शेतमजूर यांना मदत न करणारं सरकार पाहिलं. लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे. तिघे एकत्र येऊनदेखील भाजपा एक नंबरला येतं यावरुन हेच दिसतं,” अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

“विदर्भात अभुतपूर्व यश आहेच, पण कोकणातदेखील चांगलं यश मिळालं आहे. खासकरुन सिंधुदूर्गात इतक्या चांगल्या प्रकारे म्हणजेच जवळपास ८० टक्के ग्रामपंचायती जिंकलो आहोत. राणे कुटुंब, रवींद्र चव्हाण तसंच तेथील कार्यकर्ते सर्वांनीच खूप मेहनत केली. सत्तेत असतानाही रत्नागिरीत यश मिळालं नव्हतं. पण आता मोठं यश मिळालं आहे. ठाणे, रायगडमध्येही यश मिळालं आहे. स्थानिक स्तरावरचे कार्यकर्ते लढवय्ये आहेत. एकूण जे वातावरण तयार होतंय, आम्ही सातत्याने लोकांना हे सरकार कशा पद्धतीने अन्याय करतंय हे समजावून सांगतोय त्याचा एक चांगला परिणाम झाला. तिघे एकत्रित येऊनही भाजपा पहिल्या क्रमांकाच पक्ष झाला आहे,” असं फडणवीसांनी यावेळी म्हटलं.

* चंद्रकांतदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न

चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात झालेल्या पराभवावर बोलताना ते म्हणाले की, “असं होत असतं, आती मी जयंत पाटील सासूरवाडीत जिंकू शकले नाही अशी बातमी पाहिली, तिथे राष्ट्रवादी हारली. एखाद्या गावात कमी अधिक होत असतं. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रात चंद्रकांतदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. पण लोकांनी कौल भाजपाच्या बाजूने दिला. सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीत चांगलं यश मिळालं आहे. एखाद्या गावात काय झालं हे महत्वाचं नाही पण एकूण कौल भाजपाला मिळाला आहे”

* उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात

“शिवसेना पॅन महाराष्ट्र पक्षच नाही. ग्रामपंचायतीत आम्हाला तिन्ही पक्षांसोबत लढावं लागलं. या तिन्ही पक्षांच्या आपल्या जागा असून तिथे ते मजबूत आहेत. भाजपाचं मात्र तसं नाही, भाजपा आज पूर्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळेच आमच्यासाठी जागा मोठी असून ती आम्ही व्यापत आहोत,” असंही ते म्हणाले. “उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात पण ती कार जेव्हा चालवत असतात तेव्हा सगळं ट्राफिक थांबलेला असतो. त्यामुळे ती कार व्यवस्थित चालते. असं सरकार चालवता येत नाही. ट्राफिक सुरुच राहतो, सरकारकडे …त्यामुळे त्यासंदर्भात जनता योग्य उत्तर देत असल्याचं मला वाटत आहे,” असा टोला फडणवीसांनी लगावला.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

TAGGED: #भाजपच #एकनंबरचा #पक्ष #इतरपक्षांच्या #तुलनेत #आम्ही #खूप #पुढेगेलो
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बहुचर्चेतील तृतीयपंथी अंजली पाटील यांनी केली ग्रामपंचायत काबीज
Next Article सोलापुरातील ‘या’ गावात आठवलेंची सर्वांनाच धोबीपछाड, महाविकासआघाडी, भाजप पराभूत

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?