Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आणखी दोन बँका विमा कंपनीला विकणार, आर्थिक तूट कमी करण्यासाठी बँकांचे खासगीकरण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थदेश - विदेश

आणखी दोन बँका विमा कंपनीला विकणार, आर्थिक तूट कमी करण्यासाठी बँकांचे खासगीकरण

Surajya Digital
Last updated: 2021/02/01 at 1:18 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : आयडीबीआय बँकेसोबतच अन्य दोन सरकारी बँकांचे खासगीकरण होणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केलीय. तसेच एका विमा कंपनीचेही खासगीकरण केले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलीय.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केलाय. त्यावेळीच ही मोठी घोषणा करण्यात आलीय.  सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारनं प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. व्यवसाय करण्याच्या सोयीसाठी स्वतंत्र प्रशासकीय रचना करण्यात येईल. जेणेकरून कोणत्याही व्यावसायिकाला व्यवसायात कोणतीही अडचण येणार नाही. गुंतवणूकदारांसाठी एक नवीन तरतूद करण्यात आलीय. विमा क्षेत्रात एफडीआय 49 टक्क्यांवरून 74 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 2022 आर्थिक वर्षासाठी 20 हजार कोटी सरकारी बँकांना देण्यात येणार असल्याचंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलंय.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आर्थिक तूट कमी करण्यासाठी सरकारनं बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठीच आयडीबीआय बँकेसह दोन बँकांना मोदी सरकार विकणार आहे. कोरोनामुळे महसूल घटलेला असून, खर्चसुद्धा दिवसागणिक वाढत चालला आहे. राज्यांनाही खासगी क्षेत्रातील कंपन्यांची निर्गुंतवणूक करता यावी, यासाठी केंद्रीय कोषातून एक प्रोत्साहनपूरक पॅकेज आणणार आहोत, असंही सांगितलंय.

एलआयसीचा लवकरच आयपीओ येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामण यांनी केलीय. त्यामुळे एलआयसीचा आयपीओ पहिल्या सहामाहीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकारनं मूल्यांकनासाठी एका कंपनीचीही नेमणूक केली असून, शेअर बाजारातील हा सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे.

You Might Also Like

पंतप्रधान मोदी-फिजी पंतप्रधान राबुका यांची चर्चा; सात करारांवर स्वाक्षऱ्या

देशात मुसळधार पावसाचा कहर; राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे लखनऊमध्ये भव्य स्वागत

मेळघाटातील कुलांगणा खुर्द गावात ४० घरे आजही अंधारात; ५० वर्षांपासून वीज नाही

“स्वस्त तेल मिळेल तिथून खरेदी करू” – भारताच्या राजदूतांचे अमेरिकेला स्पष्ट सांगणे

TAGGED: #आणखी #दोनबँका #विमाकंपनीला #विकणार #आर्थिकतूट #कमीकरण्यासाठी #बँकांचे #खासगीकरण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शरद पवारांचे केंद्रीय कृषीमंत्री तोमरांना प्रतिउत्तर, लोकांना कृषी कायद्याबाबत सत्य सांगावे
Next Article सर्वसामान्यांची निराशा, कर संरचनेत कोणतेही बदल नाही, टॅक्स स्लॅब ‘जैसे थे’, सविस्तर वाचा

Latest News

मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू
महाराष्ट्र August 25, 2025
अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र August 25, 2025
पंतप्रधान मोदी-फिजी पंतप्रधान राबुका यांची चर्चा; सात करारांवर स्वाक्षऱ्या
देश - विदेश August 25, 2025
देशात मुसळधार पावसाचा कहर; राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत
देश - विदेश August 25, 2025
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर मेघांची सावट
महाराष्ट्र August 25, 2025
प्ले ग्रुप, नर्सरीवर सरकारची राहणार विशेष नजर
महाराष्ट्र August 25, 2025
आमदार अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्षपदी
महाराष्ट्र August 25, 2025
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे लखनऊमध्ये भव्य स्वागत
देश - विदेश August 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?