Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: देशात जातीनिहाय जनगणना होणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

देशात जातीनिहाय जनगणना होणार

admin
Last updated: 2025/04/30 at 6:56 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय

नवी दिल्ली, 30 एप्रिल (हिं.स.) : केंद्र सरकार देशात जातीनिहाय जनगणना करणार आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी आज, बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 साली पहिली जनगणना करण्यात आली होती. यापूर्वी 2011 मध्ये यूपीए सरकारच्या काळात अखेरची जनगणना झाली होती. त्यानंतर 2021 मध्ये जनगणना अपेक्षित होती. मात्र, कोरोना साथरोगामुळे ही जनगणना झाली नाही. परिणामी विरोधक गेल्या 3 वर्षांपासून सरकारकडे जनगणनेची मागणी करत आहेत. तसेच जातीनिहाय जनगणना केली जावी असा विरोधकांचा आग्रह आहे. अखेर केंद्र सरकारने आता जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे.

कॅबिनेट बैठकीतील निर्णयाची माहिती देताना मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सामाजिक रचनेचा विचार करून आणि संविधानातील स्पष्ट तरतुदी लक्षात घेऊन मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आज, बुधवारी 30 एप्रिल रोजी पुढील जनगणनेत जातीनिहाय जनगणना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सरकार आपल्या समाजाच्या व देशाच्या मूल्यांप्रती व हितसंबंधांप्रती कटीबद्ध आहे. यापूर्वी देखील सरकारने कोणत्याही समाजघटकावर अन्याय न करता, त्यांच्यावर ताण न आणता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षण लागू केले आहे. त्याचप्रमाणे हा निर्णय देखील सर्व समाजघटकांच्या कल्याणासाठी घेण्यात आला आहे.

ब्रिटिशांच्या शासन काळात 1931 मध्ये शेवटची जातनिहाय जनगणना झाली होती. त्यानंतरच्या जनगणनांमध्ये धर्म, वयोगट, लिंग, भाषेवर आधारित माहिती गोळा केली गेली, परंतु जातींची विशिष्ट आकडेवारी नोंदवली गेली नाही. त्यामुळे भारतात आजवरच्या विविध समाजघटकांच्या अचूक जातीय आकडेवारीचा अभाव आहे. संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार जातनिहाय जनगणनेचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी ओबीसी समाजाच्या अचूक लोकसंख्येचा अंदाज घेण्यासाठी ही जनगणना आवश्यक असल्याचे म्हटले. त्यांनी या मागणीसाठी बहु-पक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. काँग्रेसनेही उघडपणे या मागणीला समर्थन दिले आहे.

———————–

You Might Also Like

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार

अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मनोज जरांगेंचे 29 ऑगस्टपासून मुंबईत उपोषण
Next Article पंजाब सीमेवर अँटी ड्रोन सिस्टिम तैनात करणार

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?