Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी..; काँग्रेसची बॅनरबाजी भाजपच्या जिव्हारी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top Newsदेश - विदेश

जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी..; काँग्रेसची बॅनरबाजी भाजपच्या जिव्हारी

admin
Last updated: 2025/05/03 at 6:34 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 3 मे (हिं.स.)

जातनिहाय जनगणनेची केंद्र सरकाने घोषणा केल्यानंतर, या अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाचे श्रेय, भाजप घेण्यास सुरुवात केली आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने देखील रणनीती आखली आहे.

काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक दिल्लीत झाली असून, हा मुद्दा हातून निसटू नये, यासाठी जातगणनेच्या इतर संवेदनशील मुद्यांवरून केंद्राची कोंडी करण्याची तयारी केली आहे. केंद्राने जातनिहाय जनगणनेची घोषणा करताच, काँग्रेस देखील आक्रमक होत श्रेयवादाच्या लढाईत उतरली आहे. अमरावतीमध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी जोरदार बॅनरबाजी करत भाजपला डिवचलं आहे.

केंद्रातील मोदी सरकारने नुकतीच जातनिहाय जनगणना होणार असल्यास जाहीर केलं. काँग्रेस (Congress) नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी सातत्याने लावून धरली होती. जातगणनेला कडाडून विरोध करणाऱ्या भाजपला अखेर नमते घ्यावे लागले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 16 एप्रिल 2025 मध्ये पत्र लिहून हिच मागणी करण्यात आली होती. त्यावेळी देखील जातगणनेला विरोध करण्यात आला. पण आता केंद्रातील मोदी सरकारने जातगणनेचा निर्णय झाला. या सर्वांचे श्रेय काँग्रेसने कार्यकारी समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांना दिले. राहुल गांधी या मागणीवर आता केंद्र सरकार काम करत असल्याने त्याचे श्रेय घेण्याची तयारी संपूर्ण देशात काँग्रेसने सुरू केली आहे. भाजपकडून देखील या निर्णयाचे स्वागत होत आहे.

अमरावती शहरात काँग्रेस पक्षाच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर व काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी संपूर्ण अमरावती शहरात जोरदार बॅनरबाजी केली, आता जातीय जनगणना होणार, असा उल्लेख यामध्ये करत, बहुजन की जीत है, राहुलजी का संघर्ष है, असे म्हणत भाजपला डिवचलं आहे. जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी, असा उल्लेख बॅनरबाजीत करण्यात आला आहे.

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया देताना, राहुल गांधी यांच्या संघर्षाला यश आलं, त्यांनी सातत्याने जातीय जनगणनेची मागणी केली होती. त्यामुळे आता त्याची तातडीने अंबलबजावणी व्हावी, अशी मागणी केली.

You Might Also Like

मेघालयात अवैध बांगलादेशी कुटुंब पकडले

अमेरिकेमुळे भारतीय शेतकऱ्यांचे 4 कोटींचे नुकसान

भाजपकडून राहुल गांधींची तुलना असिम मुनीरशी

मुंबई-पुण्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक; नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन

शास्त्रज्ञ एम.आर. श्रीनिवासन यांचे निधन

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारत-पाकिस्तान पोस्टल आणि पार्सल सेवा बंद
Next Article तहसीलदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी डॉ किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात

Latest News

आमदार देवेंद्र कोटी यांनी मानले सोलापूर महापालिकेचे आभार
सोलापूर May 20, 2025
उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या प्रकल्पाची चाचणी यशस्वी
सोलापूर May 20, 2025
सोलापुरातील उद्योजकांसाठी दुबईमध्ये प्लॅटफॉर्म तयार करणार- आ. सुभाष देशमुख
सोलापूर May 20, 2025
जयकुमार गोरे यांची सोलापूर विकास मंच शिष्टमंडळाची सविस्तर बैठक फलदायी
सोलापूर May 20, 2025
मेघालयात अवैध बांगलादेशी कुटुंब पकडले
देश - विदेश May 20, 2025
अमेरिकेमुळे भारतीय शेतकऱ्यांचे 4 कोटींचे नुकसान
देश - विदेश May 20, 2025
भाजपकडून राहुल गांधींची तुलना असिम मुनीरशी
देश - विदेश May 20, 2025
अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस
Hot News May 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?