Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “केंद्र सरकार नक्षलवाद्यांशी चर्चेस तयार नाही” – भूपती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

“केंद्र सरकार नक्षलवाद्यांशी चर्चेस तयार नाही” – भूपती

admin
Last updated: 2025/07/13 at 4:30 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

तेलंगणा राज्य सरकारकडे पाठवला युद्धबंदीचा प्रस्ताव

हैदराबाद, 13 जुलै (हिं.स.) : केंद्र सरकारने चालवलेल्या नक्षलवादी विरोधी मोहिमेमुळे हताश झालेल्या नक्षलवाद्यांनी आता सरकारवर आरोप केले आहेत. केंद्र सरकार नक्षलवाद्यांशी चर्चेस तयार नसल्याचे माओवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती याने म्हंटले आहे.

केंद्र सरकारच्या कठोर भूमिकेमुळे घाबरगुंडी उडालेल्या नक्षलवाद्यांनी आता तेलंगणातील काँग्रेस सरकारपुढे युद्धबंदीचा नवा प्रस्ताव दिला आहे.

यासंदर्भात माओवाद्यांच्या पॉलिट ब्युरो या सर्वोच्च समितीचा सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ अभय उर्फ सोनू उर्फ भूपती याने नवे पत्र जारी केले आहे. या पत्रात भूपती म्हणाला की, केंद्र सरकार पाकिस्तानशी चर्चा करू शकतं, ईशान्यकडील दहशतवाद्यांशी चर्चा करून युद्धबंदी जाहीर करू शकते, मात्र आदिवासी आणि त्यांच्या संघर्षाचे नेतृत्व करणाऱ्यांशी (माओवाद्यांशी) चर्चा करण्यास तयार नाही. असा आरोप केंद्र सरकारवर ठेवून माओवाद्यांनी आता फक्त तेलंगणा सरकारसोबत युद्धबंदीचा नवा प्रस्ताव दिला आहे. सर्वच बाजूने कोंडीत सापडलेल्या माओवाद्यांनी आता चर्चेची शक्कल लढवली आहे.

यासंदर्भातील पत्रात भूपती म्हणाला की, केंद्र सरकार पाकिस्तानशी चर्चा करू शकते. मात्र आदिवासी आणि त्यांच्या संघर्षाचे नेतृत्व करणाऱ्यांशी चर्चा करण्यात केंद्र सरकारला रस नाही.

त्यामुळे आता तेलंगणा सरकारने आमच्याशी युद्धबंदी करावी. गेल्या 29 जून रोजी निजामाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माओवाद्यांसमोर आता आत्मसमर्पण शिवाय पर्याय नसल्याचे म्हंटले होते. गृहमत्र्यांच्या त्या वक्तव्याचा नक्षलवाद्यांनी पत्रात तीव्र निषेध केला आहे.पत्रात नमूद केल्यानुसार शांतता समितीने मार्च महिन्यात युद्धबंदी करून चर्चेचा आग्रह धरला होता. म्हणून 28 मार्चपासून आम्ही (माओवाद्यांनी) शांततेचे अनेक प्रस्ताव केंद्र व छत्तीसगड सरकार समोर ठेवले. माओवाद्यांविरोधातले ऑपरेशन थांबवा, नवीन कॅम्पची स्थापना करू नका, असे सांगून आम्ही 1 महिना एकतर्फी युद्धबंदी केली. मात्र त्या एक महिन्याच्या काळात सुरक्षा दलांनी 85 माओवादी कमांडर मारले. करेगुट्टा सारखं मोठे ऑपरेशन राबवले. माओवाद्यांचे जनरल सेक्रेटरी बसवराजूची हत्या केली. त्यांचे मृतदेह सुद्धा कुटुंबीयांना सोपविले गेले नाही. देशातील ईशान्यकडील राज्यात दहशतवादी संघटनांशी चर्चा करून केंद्र सरकारने युद्धबंदी केली आहे. मात्र आदिवासींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नक्षलवाद्यांच्या प्रस्तावाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे.

शांतता समितीचे सदस्य चंद्रपाल आणि हरगोपाल यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची सुद्धा या विषयावर भेट घेतल्याचा उल्लेख पत्रकात आहे. त्यामुळे केंद्र व छत्तीसगड सरकारकडे दुर्लक्ष करत तेलंगणातील काँग्रेस सरकारने आमच्याशी युद्धबंदी जाहीर करावी, असा नवा प्रस्ताव मावाद्यांच्या या पत्रात देण्यात आला आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणार – खा प्रणिती शिंदे
Next Article सोलापूर : लक्ष्मण हाके समाजात जातीय विष पेरतात – उमेश पाटील

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?