Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यात पाच दिवस अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता, शेतकऱ्यांचे नुकसान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता, शेतकऱ्यांचे नुकसान

Surajya Digital
Last updated: 2023/04/24 at 4:23 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

मुंबई : मराठवाडा व विदर्भात पुढील 5 दिवसात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे. मराठवाड्यात 26 व 27 एप्रिलला अवकाळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्यातील तापमानातही किमान 4 अंश सेल्सिअसने घट होणार आहे. उष्णतेची लाट येणार नसल्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम शेती पिकांवर होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. Chance of hail with unseasonal rain for five days in the state, loss of farmers in Maharashtra

 

राज्यात विदर्भात सोमवार, २४ एप्रिलपासून पुढील ५ दिवस म्हणजे शुक्रवार, २८ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे. राज्यात उर्वरित ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. मराठवाड्यात गुरुवार (दि.२७) व शुक्रवारी (दि.२८) गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आगामी ५ दिवस राज्यात किमान तापमान ४ अंशाने, तर कमाल तापमान २ अंशाने सरासरीपेक्षा कमी राहणार आहे.

 

आता पुन्हा एकदा बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील पुढील पाच दिवस गारपिटीसह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २७ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता नागपूरसह विदर्भात वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आल्याने फळबागायतदार पुन्हा एकदा चिंतेत आले आहेत.

 

दरम्यान सध्या नागपुरमध्ये ढगाळ वातावरण असून नागपूरचं तापमान ६ अंशाने कमी झाले आहे. तर गोंदिया जिल्ह्यात देखील पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाने शेतीचं प्रचंड नुकसान झाले आहे. तर गोंदिया जिल्ह्यात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

https://twitter.com/kapoor_pan23631/status/1647229424889401356?t=RTaDkVttg7Gaba9n6NYfcA&s=19

 

राज्यात आगामी 5 दिवस राज्यात किमान तापमान 4 अंशाने, तर कमाल तापमान 2 अंशाने सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. दरम्यान, रविवारी छत्रपती संभाजीनगरात दुपारी ढगाळ वातावरण होते. पाराही 36.2 अंश सेल्सियसवर उतरला होता. जळगावला रविवारी सर्वाधिक 39 अंश तापमान नोंदवले गेले. विदर्भात सोमवार, 24 एप्रिलपासून पुढील 5 दिवस म्हणजे शुक्रवार, 28 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे. राज्यात उर्वरित ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

 

हवामानातील चढ-उतार व बदलामुळं नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम व त्रास होतोय. तसेच प्रामुख्याने याचा शेती पिकांवर देखील परिणाम होताना दिसत आहे. पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. याचे नुकसान फळबाग तसेच शेती पिकांवर होणार असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. विदर्भात जोरदार वारे वाहून, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा इशारा आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. वादळी पाऊस, गारपिटीने राज्याच्या विविध भागात तडाखा दिला आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यातील नुकसान भरपाईसाठी पंचनामे पूर्ण झालेले नसतानाच आता पुन्हा अवकाळीचे संकट बळीराजाच्या डोकीवर बसले आहे.

 

पुढच्या चोविस तासांत राज्यात अवकाळी पावसासह गारपिट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशातील पुर्व भागात उष्णतेची लाट तर मध्य महाराष्ट्रासह कोकणात वादळी वाऱ्याचा पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील पालघरमध्ये वादळी पावसाचा तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक, सांगली, कोल्हापुर, सोलापुर या जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, मराठवाड्यातील धारशिव, लातुर, नांदेड, परभणी, हिंगोली या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे, विदर्भात तापमानाचा पारा ४० अंशांपार गेला असुन उष्णतेची काळजी घेण्याचे आवाहन भारतीय हवामान विभागाकडुन केले गेले आहे.

 

You Might Also Like

पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी

भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील

भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे – अनासपुरें

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक

सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक

TAGGED: #Chance #hail #unseasonal #rain #fivedays #state #loss #farmers #Maharashtra, #राज्य #पाचदिवस #अवकाळी #पाऊस #गारपिटी #शक्यता #शेतकरी #नुकसान #महाराष्ट्र
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वाळू माफियांना ‘घाम’ फुटला, सरकारी बाबूंनाही बसणार ‘टोला’; फडणवीसांनी ठणकावले
Next Article सोलापुरातल्या ‘त्या’ शिक्षकावर गुन्हा दाखल; निघाला आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?