नवी दिल्ली / मुंबई : राज्यात एकीकडे तापमानाचा पारा चढत आहे. त्यातच येत्या काही दिवसांत उन्हाळा आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. तसेच हवामान विभागानं येत्या चार आठवड्यांच्या हवामानाचा अंदाज वर्तवला. त्यात दुसऱ्या आठवड्यात विजेच्या कडकडाटासह राज्यात हलक्या सरीचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांत येत्या दोन-तीन दिवसांत हलक्या सरीचा पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार पश्चिम राजस्थान, अरबी समुद्र, बंगालची खाडी या दरम्यान निर्माण झालेल्या हलक्या स्वरुपाच्या चक्रीवादळाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पूर्व विदर्भात विशेषता भंडारा जिल्ह्यात १२ मार्च ते १३ मार्च दरम्यान हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाचे अधिकारी होसाळीकर यांनी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये आज विजांच्या कडकाडासह पावसाचा इशारा दिला आहे.
१२ मार्च ते १३ मार्च दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत. परंतु यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दुसरीकडे दिल्लीतील वातावरण देखील बदललं असून काही ठिकाणी पाऊस झाला आहे. हवामान विभागाचे अधिकारी होसाळीकर यांनी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागानं आज दिवसभरात शेतकऱ्यांना आणि इतरांना काळजी घेण्याचं आवाहन केले आहे.