Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: २२ किलो चांदीची विट ठेवून रचला जाणार पाया; दहा उद्योगपतींसह ३०० जणांना आमंञण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

२२ किलो चांदीची विट ठेवून रचला जाणार पाया; दहा उद्योगपतींसह ३०० जणांना आमंञण

Surajya Digital
Last updated: 2020/07/29 at 9:40 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली / अयोध्या : अयोध्येतील प्रभू राम मंदिराचं भूमिपूजन ५ ऑगस्ट रोजी केलं जाणार आहे. या दिवशी २२ किलो ६०० ग्रॅम वजनाची चांदीची वीट ठेवून पाया रचला जाणार आहे. या वीटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावही लिहिण्यात आलं आहे. तसंच ‘जय श्रीराम’ असंही लिहिण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर या विटेवर राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्तही लिहिण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन केलं जाणार आहे.

एवढंच नाही तर भूमिपूजन करण्यासाठी देशातल्या पवित्र नद्यांचं पाणीही आणलं जाणार आहे. तसंच पवित्र मातीही आणली जाणार आहे. त्यासंबंधीची तयारी सुरु करण्यात आली आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम‘वरही उपलब्ध

राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी कोण हजेरी लावणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी ३०० जणांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचे जन्मभूमि ट्रस्टकडून सांगण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये देशातील प्रसिद्ध उद्योगपतींच्या नावांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

या सोहळ्याला रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी, कुमार मंगलम बिर्ला, आनंद महिंद्रा, राहुल बजाज, राजीव बजाज यांसारख्या १० उद्योगपतींच्या नावांचाही समावेश आहे. ५ ऑगस्टला मोदी सकाळी ११.३० वाजता अयोध्येत दाखल होणार आहेत. त्यानंतर ते राम जन्मभूमीच्या दिशेकडे रवाना होती.

मिळालेल्या माहितीनुसार , भूमिपूजन कार्यक्रमात जवळपास २०० पाहुणे सहभागी होतील. यामध्ये ५० साधू-संत, ५० अधिकारी आणि ५० जण विश्व हिंदू परिषद आणि न्यासाशी संबंधित असणार आहेत. तसेच, देशातील ५० नेत्यांचाही समावेश असणार आहे.

* मुस्लिम भक्त 501 दिवे लावणार

राम मंदिराचे समर्थक अनीश खान (उर्फ बबलू) यांनी यापूर्वीच रामाच्या भव्य मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकांना घरीच राहून तूप दिवे जाळण्यासाठी आवाहन केले होते. त्यावर विश्वास ठेवून मुस्लिम बबलू खानने संपूर्ण कुटुंबासमवेत दिवे व वात गोळा करण्यास सुरवात केली आहे. 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रामललाच्या मंदिराचे भूमिपूजन करतील, त्याचवेळी भगवान राम यांच्या पायाभरणीच्या स्मरणार्थ ते 501 दिवे लावतील. या रामभक्ताने संपूर्ण देशातील मुस्लिम समाजाला आवाहन केले आहे की, सर्व लोकांनी त्यांच्या घरी दिवे लावावेत आणि दिवाळी साजरी करावी.

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

TAGGED: #चांदीचीवीट #राममंदिरभूमिपूजन #आमंञण #मुस्लिम५०१दिवे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांगलीत आज सात मृत्यू तर नवीन 139 पॉझिटिव्ह रुग्ण; रुग्णसंख्या पोहोचली 1 हजार 898 वर
Next Article कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी वॉलनेस हॉस्पिटल मिरज पुन्हा एकदा ताकदीने उभे

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?