Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा होणार पुनर्विकास – मुख्यमंत्री
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा होणार पुनर्विकास – मुख्यमंत्री

admin
Last updated: 2025/05/22 at 4:59 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, 22 मे (हिं.स.)। अमृत भारत स्थानक योजनेतून मुंबई शहराचे वैभव आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून यासाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेतून पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. बिकानेर येथे आयोजित या कार्यक्रमामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री श्री.फडणवीस परळ रेल्वे स्थानक येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी कार्यक्रमानंतर संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वंदे भारत रेल्वे, नमो भारत रेल्वे, अमृत भारत रेल्वे अशा रेल्वेच्या माध्यमातून भारतीय रेल्वेचा कायापालट होत आहे. जर्मनीच्या रेल्वे जाळ्यापेक्षा जास्त लांबीचे रेल्वेचे जाळे प्रधानमंत्री मोदी यांच्या मार्गदर्शनात मागील ११ वर्षात उभारले आहे. विमानतळांच्या धर्तीवर सर्व रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. विमानतळ परिसरात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सोयी सुविधा या अमृत भारत रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून आता सर्वसामान्य नागरिकांसाठीही उपलब्ध असणार आहेत. मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळारोड या उपनगरीय स्थानकांसह राज्यातील १५ स्थानकांचा पुनर्विकास पूर्ण झाला असून त्याचे लोकार्पण करण्यात आले. जगातील आधुनिक रेल्वे प्रणालीमध्ये आता भारतीय रेल्वेचा समावेश होत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

—————

You Might Also Like

जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ‘एसओपी’ ची अंमलबजावणी – बावनकुळे

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी लवकरच जलवाहतूक सेवा

राजेंद्र हगवणे यांच्यासह मुलाची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

इगतपुरीत जिंदाल कंपनीला लागलेली आग कायम, आजूबाजूची गावे केली खाली, महामार्गावरील वाहतूक देखील थांबविली

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक – मुख्यमंत्री

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राजेंद्र हगवणे यांच्यासह मुलाची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
Next Article पाकिस्तानी दुतावासातील दानिश आयएसआयचा एजंट

Latest News

जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ‘एसओपी’ ची अंमलबजावणी – बावनकुळे
महाराष्ट्र May 22, 2025
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी लवकरच जलवाहतूक सेवा
महाराष्ट्र May 22, 2025
पाकिस्तानी दुतावासातील दानिश आयएसआयचा एजंट
देश - विदेश May 22, 2025
राजेंद्र हगवणे यांच्यासह मुलाची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
महाराष्ट्र May 22, 2025
पाकिस्तानला प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान
देश - विदेश May 22, 2025
इगतपुरीत जिंदाल कंपनीला लागलेली आग कायम, आजूबाजूची गावे केली खाली, महामार्गावरील वाहतूक देखील थांबविली
महाराष्ट्र May 22, 2025
हिंदु राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच ! – डॉ. जयंत आठवले
देश - विदेश May 22, 2025
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राजेंद्र हगवणेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
देश - विदेश May 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?